शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

आसामचे मुख्यमंत्री कोण?, सर्बानंद सोनोवाल आणि हिंमत बिस्वा सरमा यांना बोलाविले दिल्लीत, भाजपाची महत्त्वाची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2021 10:27 IST

important meeting to decide the name of assam next cm : आसाममध्ये भाजपाने पुन्हा सत्ता राखली आहे. मात्र, हिंमत बिस्वा सरमा हे सुद्धा मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असल्याने भाजपाने अद्याप आसामचा मुख्यमंत्री निवडला नाही.

ठळक मुद्देआज सकाळी 10.30 वाजता हे दोन्ही नेते नड्डा यांना भेटणार असून त्यात राज्यातील नेतृत्वाचा तिढा सोडवण्यात येणार आहे.

नवी दिल्ली : भाजपाने आसाममध्ये विजय मिळविल्यानंतर आता नवीन मुख्यमंत्र्याची निवड होण्याची शक्यता आहे. यासाठी आज दिल्लीत भाजपाची महत्त्वाची बैठक होणर आहे. नव्या मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल आणि राज्यातील पक्षाचे बडे नेते हिंमत बिस्वा सरमा यांना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीत बोलविले आहे. त्यामुळे आसामचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, ते पाहावे लागणार आहे. (bjp jp nadda important meeting to decide the name of assam next cm sarbananda sonowal and himanta vishwa sharma)

आसाममध्ये भाजपाने पुन्हा सत्ता राखली आहे. मात्र, हिंमत बिस्वा सरमा हे सुद्धा मुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक असल्याने भाजपाने अद्याप आसामचा मुख्यमंत्री निवडला नाही. यावरून फक्त चर्चाच सुरू आहे. त्यामुळे आता जे. पी. नड्डा यांनी सर्बानंद सोनोवाल आणि हिंमत बिस्वा सरमा यांना दिल्लीत बोलविले आहे. आज सकाळी 10.30 वाजता हे दोन्ही नेते नड्डा यांना भेटणार असून त्यात राज्यातील नेतृत्वाचा तिढा सोडवण्यात येणार आहे. या बैकठीनंतर आसामच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स आज संपणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

("जगात नाचक्की! मोदींना राजकारणविरहित राष्ट्रवादाचा विचार करावा लागेल", शिवसेनेची खोचक टीका)

दरम्यान, भाजपाने विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून सर्बानंद सोनोवाल आणि हिंमत बिस्वा सरमा या दोन्ही नेत्यापैकी कोणाचेही नाव जाहीर केले नव्हते. त्यामुळे हे दोन्ही नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. येत्या एक दोन दिवसात मुख्यमंत्रीपदाचा हा तिढा सुटू शकतो, असे सांगितले जात आहे.

हिंमत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला होता

2016 मध्ये हिंमत बिस्वा सरमा यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्याचवेळी त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. मात्र, 2016च्या निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर भाजपाने सर्बानंद सोनोवाल यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली होती. पण, आता परिस्थिती बदलली आहे. बिस्वा सरमा यांनी केवळ आसामच्या पूर्वेकडील भागातच नव्हे तर संपूर्ण आसाममध्ये भाजपाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी हिंमत बिस्वा सरमा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली. अशा परिस्थितीत भाजपाकडून आसामचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाAssam Assembly Elections 2021आसाम विधानसभा निवडणूक २०२१