शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

भाजपला बहुमताची आशा; पण... कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या आमदारांवर आणि रेड्डी बंधूंवरही नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 07:57 IST

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वांत पुढे राहील, असे एक्झिट पोलचे अंदाज आहेत.

हरीश गुप्ता 

नवी दिल्ली :कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वांत पुढे राहील, असे एक्झिट पोलचे अंदाज आहेत. तथापि, भाजप नेतृत्वाला मात्र पुरेसे संख्याबळ मिळण्याचा विश्वास आहे.

भाजपच्या अंतर्गत अंदाजानुसार, २०१८ मध्ये पक्षाला २२४ पैकी १०४, अशा सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसने जेडीएससोबत निवडणुकीनंतर आघाडी करत कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपद दिले. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसच्या काही आमदारांनी सरकारची साथ सोडत भाजपसोबत हातमिळवणी केली आणि भाजपचे नेते बी.एस. येडियुरप्पा हे मुख्यमंत्री झाले.

जुलै २०२१ मध्ये येडियुरप्पा यांच्या जागी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रिपद देत भाजपने जोखीम पत्करली. भाजपला बहुमत मिळेल, अशी बोम्मई यांना आशा आहे; पण भाजपने आता जेडीएसशी संपर्क सुरू केला आहे. केंद्रातील भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्यासोबत संपर्क केल्याचे समजते, तर अन्य एक नेते एच.डी. कुमारस्वामी यांच्या संपर्कात आहेत.

भाजप मुख्यमंत्रिपद जेडीएसला देण्यास तयार आहे की नाही, हे निश्चित नाही; पण सरकार स्थापन करण्यास संख्याबळ कमी पडल्यास जेडीएसची कोणतीही मागणी भाजप पूर्ण करू शकते. 

भाजपला ९० पेक्षा कमी जागा मिळाल्यास परिस्थिती बदलू शकते. भाजपला असे वाटते की, मोठ्या संख्येने महिलांनी पक्षाला मतदान केले आहे, तर अल्पसंख्याक आणि वोक्कलिगा या समुदायाचे मतदान जेडीएसकडे गेले आहे.

यावेळी बोम्मई यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळणार नसल्याचे संकेत आहेत, तर पक्षाकडून नवीन चेहरा समोर आणला जाऊ शकतो. भाजपच्या एका नेत्याने सांगितले की, कर्नाटकात कोणीही जिंकले तरी आम्ही सरकार स्थापन करू.

टॅग्स :Karnatakकर्नाटकBJPभाजपाcongressकाँग्रेस