शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

भाजपने निवडणुकीवर खर्च केले २७ हजार कोटी रुपये; एवढी रक्कम आली कोठून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 03:54 IST

या अहवालात याचाही खुलासा करण्यात आला आहे की, लोकसभा निवडणुकीत जो एकूण खर्च झाला त्याची ४५ टक्के रक्कम एकट्या भाजपने आपल्या निवडणूक मोहिमेवर खर्च केली आहे.

शीलेश शर्मा नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत ‘३०० पार’चा नारा देऊन जिंकलेल्या भाजपने निवडणुकीत २७ हजार कोटी रुपये पाण्यासारखे खर्च केले आहेत. ‘सेंटर फॉर मीडिया स्टडीज’च्या ताज्या अहवालात हा खुलासा करण्यात आला आहे.

या अहवालात याचाही खुलासा करण्यात आला आहे की, लोकसभा निवडणुकीत जो एकूण खर्च झाला त्याची ४५ टक्के रक्कम एकट्या भाजपने आपल्या निवडणूक मोहिमेवर खर्च केली आहे. या अहवालानुसार निवडणूकीचा एकूण खर्च ५५ हजार कोटी एवढा झाला आहे.भाजपने ४३७ जागांवर आपले उमेदवार उभे केले. तर, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ६२ कोटी रुपये खर्च केले. या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसने विचारले आहे की, अखेर एवढी रक्कम आली कोठून? पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, २०१९ मध्ये निवडणुकी भाजपने जो खर्च केला त्यातून देशाच्या आरोग्य बजेटची ४३ टक्के भरपाई झाली असती. १० टक्के भरपाई संरक्षण बजेटची आणि ४५ टक्के मनरेगाची झाली असती. काँग्रेसने नमामि गंगेवर सवाल उपस्थित केले आहेत आणि म्हटले आहे की, मोदी सरकारने पाच वर्षात गंगा स्वच्छतेवर २४ हजार कोटी खर्च केले आहेत. पण, गंगा स्वच्छ झाली का?

प्रत्येक मतदारावर केला ७०० रुपये खर्चया सर्व्हे रिपोर्टमध्ये याचाही उल्लेख करण्यात आला आहे की, भाजपने प्रत्येक मतदारावर ७०० रुपये खर्च केले. म्हणजेच, प्रत्येक मतदारसंघात १०० कोटी एवढी रक्कम होते. काँग्रेसने असा दावा केला आहे की, देशातील १० ते १२ टक्के मतदारांनी हे स्वीकार केले आहे की, त्यांना भाजपकडून मत टाकण्यासाठी नगदी रक्कम देण्यात आली.निवडणूक आयोगावर सवाल उपस्थित करत अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले आहे की, निवडणूक बॉण्डमध्ये पारदर्शकता आणली जावी. कारण, निवडणूक बॉण्डबाबत जी व्यवस्था करण्यात आली त्यावरून असे वाटते की, सत्तारूढ पक्षाला लाभ देण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली.काँग्रेसने अशीही मागणी केली आहे की, तत्काळ राष्ट्रीय निवडणूक निधीची स्थापना करण्यात यावी. यात कोणीही व्यक्ती आपल्या इच्छेनुसार दान देऊ शकेल.

टॅग्स :BJPभाजपा