शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

राजस्थानात राजेंचे शक्तिप्रदर्शन! विष्णू देव साय हाेणार छत्तीसगडचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 05:40 IST

मध्य प्रदेशचा आज ठरणार

रायपूर/जयपूर : भाजपने जिंकलेल्या तीनपैकी दाेन राज्यांचे मुख्यमंत्री काेण हाेणार, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. तर, छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदी भाजपचे ज्येष्ठ आदिवासी नेते विष्णू देव साय यांची निवड करण्यात आली आहे.  राजस्थानात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधिया यांनी शक्ति प्रदर्शन सुरूच ठेवले आहे. रविवारी देखील १३ आमदारांनी त्यांची भेट घेतली.

रायपूर येथे पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची दुपारी येथे बैठक झाली. यात पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने नियुक्त केलेले निरीक्षक केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल व पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम उपस्थित होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांनी साय यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला व प्रदेशाध्यक्ष अरुण साव, ज्येष्ठ नेते ब्रिजमोहन अग्रवाल यांनी त्याला अनुमोदन दिले.

माजी केंद्रीय मंत्री साय हे सुरगुजा विभागातील कुनकुरी मतदारसंघातून निवडून आले आहेत. भाजपने या विभागातील सर्व १४ जागा जिंकल्या आहेत. या बैठकीत साय यांची एकमताने भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या आमदारांनी घेतली वसुंधरा राजेंची भेट

nराजस्थानमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी पक्षाच्या काही नवनिर्वाचित आमदारांनी रविवारी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. वसुंधरा राजे या दिल्लीहून परतल्यानंतर आमदार त्यांची भेट घेत आहेत.

nअजय सिंह, बाबू सिंह यांच्यासह सुमारे १० आमदार राजे यांच्या निवासस्थानी पोहोचले. मुख्यमंत्रिपदासाठी त्या आघाडीवर आहेत. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर पक्षाचे संसदीय बोर्ड मुख्यमंत्र्यांच्या नावावर अंतिम निर्णय घेणार आहे. पक्षाने यापूर्वीच केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह तीन निरीक्षकांची घोषणा केली आहे. ते साेमवारी जयपूर येथे दाखल हाेऊ शकतात.

मध्य प्रदेशात काय सुरू? विधिमंडळ पक्षाची आज बैठक

भोपाळ : मध्य प्रदेशातील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची सोमवारी विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यासाठी बैठक होणार आहे. सोमवारी दुपारी ४ वाजता बैठक सुरू होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते, असे एका आमदाराने सांगितले. पक्षाचे निरीक्षक सकाळी ११ वाजता पाेहाेचण्याची अपेक्षा आहे.

मोदींची गॅरंटी पूर्ण करणार : विष्णू देव साय

मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर साय पत्रकारांना म्हणाले, “मुख्यमंत्री या नात्याने मी सरकारच्या माध्यमातून मोदींची हमी (भाजपचे निवडणूकपूर्व आश्वासन) पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.

राज्यातील १८ लाख घरे (प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत) मंजूर करणे हे त्यांच्या सरकारचे पहिले काम असेल.

निवडणुकीला सामोरे जाताना भाजपने शेतकऱ्यांना ३,१०० रुपये प्रतिक्विंटल दराने प्रति एकर २१

क्विंटल धान खरेदी व महिलांना वर्षाला १२ हजार रुपये देण्यासह अनेक आश्वासने दिली आहेत.

टॅग्स :BJPभाजपा