शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

भाजपाने दिली जनतेला महागाईची भयंकर भेट, प्रियांका गांधी यांनी केली सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 06:38 IST

Priyanka Gandhi : ग्राहक खाद्यान्न मूल्य निर्देशांक १० टक्क्यांच्या वर गेला आहे. सप्टेंबर- ऑक्टोबरमधील आकडे सांगतात की, भाज्यांचे भाव २२.७१ टक्के वाढले आहेत व वाढत आहेत. 

-  शीलेश शर्मा

नवी दिल्ली : बिघडत चाललेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईच्या मुद्यावरून मोदी सरकारवर विरोधी पक्ष टीका करत आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीत रोजगारानंतर महागाई मोठा मुद्दा बनला आहे. महागाईच्या प्रश्नावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्ला करताना म्हटले की, ‘‘भाजपाकडून जनतेला दिवाळीची भेट : भयंकर महागाई. भाजपाची त्याच्या भांडवलदार मित्रांना दिवाळीची भेट : ६ विमानतळ, भांडवलदारांची सोबत, भांडवलदारांचा विकास” प्रियंका गांधी यांच्या ट्वीटसोबत नेते राहुल गांधी यांनीही ट्वीट केले : “देशाच्या शेतकऱ्यांनी मागितली मंडई, पीएमनी दिली भयानक मंदी.’’या दोन्ही नेत्यांनी टीका भाज्या, फळे, डाळी आदी दैनंदिन गरजांच्या वस्तुंचे भाव वाढल्यानंतर केली आहे. बाजार भावाबद्दल बोलायचे तर बटाटे व कांदे किलोला ५० ते ९० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. कृषी मंत्रालयाचे आकडे सांगतात की, २०१८-२०१९ मध्ये बटाटे कोल्ड स्टोरेज भांडारमध्ये २३८ लाख टनांपेक्षा जास्त होता तो २०२० मध्ये २१४ लाख टनांवर आला. हिच परिस्थिती डाळी आणि दुसऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तुंची आहे.भाजपाशी युती करण्यापेक्षा राजकारण संन्यास घेईन.

ग्राहक खाद्यान्न मूल्य निर्देशांक १० टक्क्यांच्या वर गेला आहे. सप्टेंबर- ऑक्टोबरमधील आकडे सांगतात की, भाज्यांचे भाव २२.७१ टक्के वाढले आहेत व वाढत आहेत. हीच परिस्थिती कमीअधिक डाळींची आहे. त्यांचे भाव १४ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या १० वर्षांत यंदा प्रथमच बटाट्याचे भाव ५० ते ६० रूपये किलो झाले आहेत. २०१९ मध्ये जो कांदा साधारण ४५ रुपये किलो होता तोच २०२० मध्ये ११० रुपये किलो विकला गेला. याचा अर्थ तो १४३ टक्के महाग झाला. आज उडिदाची डाळ १०६ रुपये किलो, तुरीची डाळ १०७ रुपये, मसूर डाळ ७८ रुपये किलो, मूग डाळ  १०३ रुपये किलो मिळत आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा