शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

कलम 370, तिहेरी तलाक, CAA अन्...जेपी नड्डांनी वाचला मोदी सरकारच्या कामांचा पाढा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 16:41 IST

BJP Government : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला आज ११ वर्षे पूर्ण झाली आहेत.

BJP Government : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केंद्रातील मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला. नवी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची राजकीय संस्कृती बदलून एक नवीन युग सुरू केले आहे. तुष्टीकरणाची जागा जबाबदारी, पारदर्शकता आणि विकासाने घेतली आहे. नड्डांनी मोदी सरकारचे वर्णन एक मजबूत सरकार असे केले. 

नड्डा पुढे म्हणाले, ११ वर्षांपूर्वी देश तुष्टीकरणाचे राजकारण पाहत होता, परंतु पंतप्रधान मोदींनी ते बदलले आणि जबाबदारीचे आणि रिपोर्ट कार्ड राजकारण सुरू केले. त्यांनी यावर भर दिला की, मोदी सरकारने एक नवीन व्यवस्था स्थापित केली आहे. हे असे सरकार आहे, जे भविष्याकडे पाहून काम करते. पूर्वीची सरकारे भ्रष्टाचारात बुडालेली आणि तुष्टीकरणावर विश्वास ठेवणारी होती, परंतु आम्ही नकारात्मकतेपासून सकारात्मकतेकडे गेलो.

'मोदी है तो मुमकीन है'आज भारतातील सामान्य नागरिक 'मोदी है तो मुमकीन है' असे मानतो. यावेळी नड्डांनी सरकारच्या तीन मुख्य कामगिरीवर प्रकाश टाकला: विकास, शोध आणि नवोन्मेष. ते म्हणाले, कामगिरी, सुधारणा आणि परिवर्तनाचा मंत्र आमच्या धोरणांमध्ये दिसून येतो. आम्ही 'सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास' हे तत्व स्वीकारले आहे.

कठोर निर्णयांमुळे...भाजप अध्यक्षांनी सरकारच्या काही ऐतिहासिक निर्णयांचा उल्लेख केला, ज्यात कलम ३७० रद्द करणे, तिहेरी तलाक यांचा समावेश आहे. कलम ३७० हटवण्याचा संदर्भ देत ते म्हणाले, देशाने हे शक्य नाही हे मान्य केले होते, परंतु मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवले. लोकसभेत ५८.४६ टक्के मतदान झाले, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत ६३ टक्के मतदान झाले. मोदी सरकारच्या धाडसी निर्णयामुळे हा बदल झाला आहे. तिहेरी तलाक रद्द करून आमच्या सरकारने महिलांना आदर आणि अधिकार दिले.

कर संकलनात २३८% वाढसरकारने देश आणि समुदायाचे हित बळकट करण्यासाठी नवीन वक्फ कायदा केला. आमच्या सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA), नोटाबंदी, महिला आरक्षण आणि अर्थसंकल्पीय सुधारणा यासारखी पावले उचलली. भारत लवकरच जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. परकीय चलन साठा, निर्यात आणि थेट परकीय गुंतवणूक (FDI) मध्ये वाढ झाली आहे. कर संकलनातही २३८% वाढ झाली असल्याचे नड्डा म्हणाले.

आम्ही सर्व वर्गांची काळजी घेतलीनड्डा पुढे म्हणतात, सर्व प्रतिकूल परिस्थिती असूनही, भारताची अर्थव्यवस्था मजबूत पद्धतीने पुढे जात आहे. हे सरकार पारदर्शकतेचे एक नवीन उदाहरण मांडत आहे. गेल्या दशकात आम्ही एससी-एसटी-ओबीसींसह समाजाच्या सर्व वर्गांची काळजी घेतली आहे. त्याच प्रकारे आम्ही महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला पुढे नेले आहे. महिलांना वैमानिक बनवण्यापासून ते त्यांना सैन्यात कमिशन देण्यापर्यंत, सैनिक शाळांमध्ये प्रवेश देण्यापासून ते एनडीएमध्ये भरतीपर्यंत, लखपती दीदींपासून ते स्वयंसेवा गटांना प्रोत्साहन देण्यापर्यंत... मोदी सरकारमध्ये महिला आणि एससी-एसटी-ओबीसी सर्वांना मुख्य प्रवाहात जोडले गेले आहे.

२५ कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आलेआम्ही गरीबी हटावचा नारा घेऊन आलो नाही, तर गरिबांचे कल्याण करून दाखवले. हे आकडे याचा पुरावा आहेत... देशातील २५ कोटी लोक दारिद्र्यरेषेतून बाहेर आले आहेत. अशाप्रकारे, अत्यंत गरिबी ८० टक्क्यांनी कमी झाली आहे. चिनाब पुलाचा संदर्भ देत ते म्हणाले की, चिनाब पुलाची पायाभरणी १९९५ मध्ये नरसिंह राव यांच्या काळात झाली होती आणि अटलजींनी तो 'राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प' घोषित केला होता. पण, पंतप्रधान मोदींनी हा प्रकल्प पूर्ण केला आणि ६ जून २०२५ रोजी तो देशाला समर्पित केला. समस्या पुढे ढकलणे हे सरकारचे धोरण किंवा पद्धत राहिलेली नाही. सरकारने समाजातील सर्व घटकांची काळजी घेतली आणि त्यांचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला आणि आज आपण पूर्ण ताकदीने विकसित भारताकडे झेप घेण्यास तयार आहोत, असेही नड्डा यावेळी म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाJ P Naddaजगत प्रकाश नड्डाNarendra Modiनरेंद्र मोदी