शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

भाजपचे मिशन २०२४ : विरोधी पक्षांच्या एकजुटीत फूट पाडण्याचा फॉर्म्युला; खास रणनीतीवर काम करू शकते

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 10:51 IST

उत्तर प्रदेश-पंजाबपासून दक्षिण भारतापर्यंत भाजप त्या पक्षांशी युती करण्याचा प्रयत्न करू शकते, जे अजूनही विरोधी ऐक्यापासून दूर आहेत.

नवी दिल्ली : आगामी वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) आतापासूनच सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात लढण्यासाठी विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. अलीकडेच पाटणा येथे विरोधी पक्षांची एक बैठक झाली. या बैठकीत २० हून अधिक विरोधी पक्ष सहभागी झाले होते. मात्र आता भाजपने विरोधी पक्षांची एकजूट तोडण्याचा फॉर्म्युला शोधला असल्याचे म्हटले आहे. यासाठी भाजप विशेष रणनीतीवर काम करू शकते. 

उत्तर प्रदेश-पंजाबपासून दक्षिण भारतापर्यंत भाजप त्या पक्षांशी युती करण्याचा प्रयत्न करू शकते, जे अजूनही विरोधी ऐक्यापासून दूर आहेत. एका विशेष रणनीती अंतर्गत, भाजप देशभरातील सर्व ५४३ लोकसभा जागांवर लक्ष ठेवण्यासाठी तीन झोन तयार करू शकते आणि त्या सर्वांचे वेगवेगळे प्रभारी असतील. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ज्या पक्षाची कामगिरी चांगली आहे, त्यांना सरकार स्थापन करणे सोपे जाते, असे म्हटले जाते. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजप पुन्हा एकदा ओमप्रकाश राजभर यांचा पक्ष एसबीएसपीसोबत हातमिळवणी करू शकतो. दोघेही जुने मित्र आहेत. याचा फायदा पूर्वांचलमध्ये भाजपला होऊ शकतो. 

भाजप बिहारमध्ये मांझी, व्हीआयपी पक्षाचे मुकेश साहनी आणि रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांना आपल्यासोबत घेऊ शकते. दरम्यान, चिराग पासवान यांचे काका आधीच एलजेपी कोट्यातून एनडीएमध्ये मंत्री आहेत. अशाप्रकारे भाजप बिहारमध्ये नितीश-लालूंच्या विरोधात घेराव घालणार आहे. याचबरोबर, दक्षिणेत कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सत्ता गमावल्याने आता भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत फारसे नुकसान होणार नाही, यासाठी देवेगौडांच्या पक्ष जेडीएसशी हातमिळवणी करू शकते. भाजप आणि जेडीएस एकत्र आल्यास कर्नाटकात त्यांचे मताधिक्य ५० टक्क्यांच्या जवळपास पोहोचू शकतो. 

तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये ताकदीसाठी भाजप चंद्राबाबू नायड यांच्या पक्ष टीडीपीसोबत येऊ शकतो. दोघांची यापूर्वी युती आहे. टीडीपीसोबत युती केल्यास आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यात भाजपची ताकद वाढू शकते. भाजप पुन्हा एकदा आपला जुना भागीदार शिरोमणी अकाली दल (एसएडी) सोबत एकत्र येऊ शकतो. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये समझोता होण्याची शक्यता आहे, कारण भाजपला पंजाबमध्ये काँग्रेस आणि आपच्या आव्हानावर मात करायची असेल तर अकालींचा पाठिंबा प्रभावी ठरू शकतो. तसेच, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब आणि दक्षिणमधून भाजपला जास्त जागा मिळाल्या तर बहुमताचा २७२ चा आकडा पार करणे फारसे अवघड जाणार नाही.

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक