शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चीनने भारताच्या ४ हजार चौरस किमी जागेवर अतिक्रमण केले; सुब्रमण्यम स्वामींची हायकोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 17:08 IST

Subramanian Swamy: पंतप्रधान मोदी चीनच्या मुद्द्यावर मौन बाळगत असल्यासंदर्भात विरोधकांसह आता भाजपमधील नेते विचारणा करू लागले आहेत.

Subramanian Swamy: गेल्या काही वर्षापासून भारत आणि चीन या दोन देशांमध्ये लडाख येथील सीमेवरून तीव्र संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर तोडगा काढण्याचा दोन्ही देशांकडून प्रयत्न केला जात आहे. चीनच्या मुद्द्यावरून विरोधक केंद्र सरकारला चांगलेच कोंडीत पकडण्याचा सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत. यातच आता भाजपमधूनही चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनाबाबत प्रश्न विचारले जात आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका केली आहे. पंतप्रधान भारतातील विरोधी पक्षांवर हल्लाबोल करतात. मात्र चीनचे नाव घेताच त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नाही. चीनने आमच्या हजारो चौरस किलोमीटर जमिनीवर कब्जा केला आहे. यावर पंतप्रधान मोदी अजूनही एक शब्दही बोलू शकत नाहीत, या शब्दांत स्वामी यांनी निशाणा साधला.

चीनकडून ४ हजार चौरस किलोमीटर जमिनीवर अतिक्रमण

चीनच्या मुद्द्यावर स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. चीनने ४ हजार चौरस किलोमीटर जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप स्वामी यांनी आपल्या याचिकेत केला आहे. याचिकेवर उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तरही मागवले आहे. दुसरीकडे, सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावरही टीका केली आहे. परराष्ट्रमंत्री यांचा काही उपयोग नाही. ते फक्त आपल्या मालकांची भाषा बोलतात, अशी टीका केली होती. 

दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी हे एकेकाळी जनता दलाचे मोठे नेते होते. मात्र, नंतर भाजपच्या हिंदुत्ववादी धोरणांनी प्रभावित होऊन पक्षात प्रवेश केला. भाजपने त्यांना राज्यसभेचे तिकीटही दिले. स्वामींचा कार्यकाळ संपल्यावर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी पुन्हा राज्यसभेवर पाठवले नाही. 

 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीindia china faceoffभारत-चीन तणाव