शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
3
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
4
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
5
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
6
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
7
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
8
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
9
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
10
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
11
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
12
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
13
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
14
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
15
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
16
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
17
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
18
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
19
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
20
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड

चीनने भारताच्या ४ हजार चौरस किमी जागेवर अतिक्रमण केले; सुब्रमण्यम स्वामींची हायकोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2023 17:08 IST

Subramanian Swamy: पंतप्रधान मोदी चीनच्या मुद्द्यावर मौन बाळगत असल्यासंदर्भात विरोधकांसह आता भाजपमधील नेते विचारणा करू लागले आहेत.

Subramanian Swamy: गेल्या काही वर्षापासून भारत आणि चीन या दोन देशांमध्ये लडाख येथील सीमेवरून तीव्र संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यावर तोडगा काढण्याचा दोन्ही देशांकडून प्रयत्न केला जात आहे. चीनच्या मुद्द्यावरून विरोधक केंद्र सरकारला चांगलेच कोंडीत पकडण्याचा सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत. यातच आता भाजपमधूनही चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनाबाबत प्रश्न विचारले जात आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा भाजपचे माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका केली आहे. पंतप्रधान भारतातील विरोधी पक्षांवर हल्लाबोल करतात. मात्र चीनचे नाव घेताच त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नाही. चीनने आमच्या हजारो चौरस किलोमीटर जमिनीवर कब्जा केला आहे. यावर पंतप्रधान मोदी अजूनही एक शब्दही बोलू शकत नाहीत, या शब्दांत स्वामी यांनी निशाणा साधला.

चीनकडून ४ हजार चौरस किलोमीटर जमिनीवर अतिक्रमण

चीनच्या मुद्द्यावर स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. चीनने ४ हजार चौरस किलोमीटर जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप स्वामी यांनी आपल्या याचिकेत केला आहे. याचिकेवर उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तरही मागवले आहे. दुसरीकडे, सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यावरही टीका केली आहे. परराष्ट्रमंत्री यांचा काही उपयोग नाही. ते फक्त आपल्या मालकांची भाषा बोलतात, अशी टीका केली होती. 

दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी हे एकेकाळी जनता दलाचे मोठे नेते होते. मात्र, नंतर भाजपच्या हिंदुत्ववादी धोरणांनी प्रभावित होऊन पक्षात प्रवेश केला. भाजपने त्यांना राज्यसभेचे तिकीटही दिले. स्वामींचा कार्यकाळ संपल्यावर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी पुन्हा राज्यसभेवर पाठवले नाही. 

 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीindia china faceoffभारत-चीन तणाव