शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 17:35 IST

मतदारयाद्यांमधील घोळ आणि बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून रणकंदन सुरू असतानाच बिहारचे उपमुख्यमंत्री दोन मतदारसंघात मतदार असल्याचे समोर आले आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदारयांद्यामधील घोळ आणि बोगस मतदारांच्या मु्द्यावरून केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यातच आता बिहारचे भाजपचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा हे दोन विधानसभा मतदारसंघात मतदार असल्याचे समोर आले आहे. याच प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दिल्लीतील राजकारण बोगस मतदार आणि मतदारयाद्यांमधील घोळामुळे तापलेले असताना आता बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी नवा बॉम्ब फोडला. बिहारचे भाजपचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे दोन विधानसभा मतदारसंघात मतदार म्हणून नाव असल्याचे आणि त्यांच्याकडे दोन ओळखत्र असल्याचे त्यांनी पुरावे दाखवले. 

मोदींचे खास उपमुख्यमंत्री

तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियावर भाजपचे बिहारमधील उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे दोन्ही मतदारसंघातील यादीमध्ये असलेल्या नावाचे फोटो पोस्ट केले आहेत. 'हे आहेत मोदीजींचे खास बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा', असे म्हणत तेजस्वी यादव यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला सवाल केले आहेत. 

निवडणूक आयोगाची सिन्हा यांना नोटीस 

केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेत विजय सिन्हा यांना नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने विशेष मतदार यादी पडताळणी कार्यक्रमानंतरही आपले नाव बांकीपूर विधानसभा मतदारसंघ आणि लखीसराय विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी आढळून आले आहे. या प्रकरणी १४ ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत भूमिका स्पष्ट करावी, असे आयोगाने म्हटले आहे. 

उपमुख्यमंत्री विजय सिन्हा काय म्हणाले?

तेजस्वी यादव यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आणि निवडणूक आयोगाकडून बजावण्यात आलेल्या नोटीसवर बोलताना विजय सिन्हा म्हणाले, जेव्हा आम्ही पाटण्यातील कदमकुआ परिसरात राहत होतो, तेव्हा संपूर्ण कुटुंबातील मतदार असलेल्या सदस्यांची नावे बांकीपूर विधानसभा मतदारसंघात होती. 

एप्रिल २०२४ लखीसराय विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीत नावांचा समावेश करावा म्हणून अर्ज भरला होता. त्याचवेळी बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या यादीतून नावे हटवण्यात यावीत, म्हणूनही फॉर्म भरलेला. कुठल्यातरी कारणामुळे नाव वगळले गेले नाही आणि मतदार पुर्नपडताळणीनंतरही नाव तशीच राहिली आहेत. हे समजल्यावर पुन्हा बीएलओंना बोलवून नाव वगळावी म्हणून सांगितलं. माझ्याकडे याचे पुरावे आहेत, असे उपमुख्यमंत्री सिन्हा म्हणाले. 

टॅग्स :BiharबिहारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliticsराजकारणTejashwi Yadavतेजस्वी यादव