शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 17:35 IST

मतदारयाद्यांमधील घोळ आणि बोगस मतदारांच्या मुद्द्यावरून रणकंदन सुरू असतानाच बिहारचे उपमुख्यमंत्री दोन मतदारसंघात मतदार असल्याचे समोर आले आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदारयांद्यामधील घोळ आणि बोगस मतदारांच्या मु्द्यावरून केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. त्यातच आता बिहारचे भाजपचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा हे दोन विधानसभा मतदारसंघात मतदार असल्याचे समोर आले आहे. याच प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

दिल्लीतील राजकारण बोगस मतदार आणि मतदारयाद्यांमधील घोळामुळे तापलेले असताना आता बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी नवा बॉम्ब फोडला. बिहारचे भाजपचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे दोन विधानसभा मतदारसंघात मतदार म्हणून नाव असल्याचे आणि त्यांच्याकडे दोन ओळखत्र असल्याचे त्यांनी पुरावे दाखवले. 

मोदींचे खास उपमुख्यमंत्री

तेजस्वी यादव यांनी सोशल मीडियावर भाजपचे बिहारमधील उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांचे दोन्ही मतदारसंघातील यादीमध्ये असलेल्या नावाचे फोटो पोस्ट केले आहेत. 'हे आहेत मोदीजींचे खास बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा', असे म्हणत तेजस्वी यादव यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला सवाल केले आहेत. 

निवडणूक आयोगाची सिन्हा यांना नोटीस 

केंद्रीय निवडणूक आयोगाने या प्रकरणाची दखल घेत विजय सिन्हा यांना नोटीस बजावली आहे. निवडणूक आयोगाने विशेष मतदार यादी पडताळणी कार्यक्रमानंतरही आपले नाव बांकीपूर विधानसभा मतदारसंघ आणि लखीसराय विधानसभा मतदारसंघातील मतदार यादी आढळून आले आहे. या प्रकरणी १४ ऑगस्ट सायंकाळी पाच वाजेपर्यंत भूमिका स्पष्ट करावी, असे आयोगाने म्हटले आहे. 

उपमुख्यमंत्री विजय सिन्हा काय म्हणाले?

तेजस्वी यादव यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आणि निवडणूक आयोगाकडून बजावण्यात आलेल्या नोटीसवर बोलताना विजय सिन्हा म्हणाले, जेव्हा आम्ही पाटण्यातील कदमकुआ परिसरात राहत होतो, तेव्हा संपूर्ण कुटुंबातील मतदार असलेल्या सदस्यांची नावे बांकीपूर विधानसभा मतदारसंघात होती. 

एप्रिल २०२४ लखीसराय विधानसभा मतदारसंघातील मतदारयादीत नावांचा समावेश करावा म्हणून अर्ज भरला होता. त्याचवेळी बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या यादीतून नावे हटवण्यात यावीत, म्हणूनही फॉर्म भरलेला. कुठल्यातरी कारणामुळे नाव वगळले गेले नाही आणि मतदार पुर्नपडताळणीनंतरही नाव तशीच राहिली आहेत. हे समजल्यावर पुन्हा बीएलओंना बोलवून नाव वगळावी म्हणून सांगितलं. माझ्याकडे याचे पुरावे आहेत, असे उपमुख्यमंत्री सिन्हा म्हणाले. 

टॅग्स :BiharबिहारElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगPoliticsराजकारणTejashwi Yadavतेजस्वी यादव