शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

भाजपने १६३ जागांवर तैनात केले दिग्गज नेते; रायबरेली, अमेठीमध्ये सोशल इंजिनीअरिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 07:23 IST

अंतिम तीन टप्प्यांतील सर्व जागा जिंकण्यासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली आहे.

संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :  भारतीय जनता पक्षाने शेवटच्या तीन टप्प्यात लोकसभेच्या १६३ जागांवर दिग्गज नेत्यांची नियुक्ती करून जागा जिंकण्याची जबाबदारी दिली आहे. या सर्व जागांवर जातीय समीकरणे डोळ्यासमोर ठेवून नेत्यांना तैनात केले आहे.

अंतिम तीन टप्प्यांतील सर्व जागा जिंकण्यासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली आहे. निवडणुका झालेल्या १८ राज्यांतील नेत्यांना उर्वरित जागांवर पाठविले आहे. मुख्यमंत्री मोहन यादव, भजनलाल शर्मा, हेमंत बिस्वा सरमा, माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकच्या नेत्यांना या जागाी तैनात केले आहे. 

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यावरही जबाबदारी

भाजपने अमेठी आणि रायबरेलीमध्ये सोशल इंजिनिअरिंगचे मास्टर नेते पाठवले आहेत. केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल यांना मायक्रो मॅनेजमेंटसाठी अमेठी आणि रायबरेलीमध्ये पाठविले आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनाही अमेठी-रायबरेलीमध्ये अधिक वेळ देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अमेठीमध्ये ओबीसी आणि मौर्य यांची संख्या मोठी आहे. रायबरेली आणि अमेठीच्या ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांना पाठविण्यात आले आहे. रायबरेलीत ब्राह्मण मोठ्या संख्येने आहेत आणि राजपूतही मोठ्या संख्येने आहेत. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uttar Pradesh Lok Sabha Election 2024उत्तर प्रदेश लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपा