शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

‘तृणमूल’च्या बालेकिल्ल्याला पाडले खिंडार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 3:50 AM

लोकसभा निवडणुकांमध्ये देशभरात मिळालेल्या प्रचंड यशामुळे भाजप सुखावणे स्वाभाविक आहे.

- समीर परांजपेलोकसभा निवडणुकांमध्ये देशभरात मिळालेल्या प्रचंड यशामुळे भाजप सुखावणे स्वाभाविक आहे. मात्र पश्चिम बंगालमधील यशामुळे या पक्षाचा आनंद नक्कीच द्विगुणित झाला आहे. या राज्यातील ४२ पैकी १८ लोकसभा जागांवर विजय मिळवून भाजपने तृणमूल काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आहे. तृणमूल काँग्रेसला २२ जागांवर विजय मिळाला आहे. तृणमूल काँग्रेसला ४३.२८ टक्के तर भाजपला ४०.२५ टक्के मते मिळाली आहेत.२०१४च्या लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांच्या आघाडीने लोकसभेच्या केवळ दोन जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीत त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.शिवप्रकाश पश्चिम बंगालमध्ये भाजपची संघटना बळकट करत असतानाच राजकीय आघाडी कैलाश विजयवर्गीय यांनी सांभाळली. ममता बॅनर्जी यांच्या कारभाराचे वाभाडे काढण्याची कामगिरी त्यांनी चोखपणे बजावली. माजी रेल्वेमंत्री मुकुल रॉय हे तृणमूल काँग्रेसमधून २०१७ साली भाजपत आले ही मोठी घटना होती. त्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या आमदार, खासदार, नेत्यांसह बारा-तेरा जणांना भाजपमध्ये सामील करून घेण्यात आले. ममता बॅनर्जी यांचा एककल्ली स्वभाव व कारभार याला बंगालमधील अनेक लोक कंटाळले होते. डावी आघाडी, काँग्रेस मरगळलेले असल्याने त्यांना तृणमूल काँग्रेसविरोधात एक सशक्त पर्याय हवा होता. २८ मार्च ते १ मे या कालावधीत बंगालमध्ये मोदींच्या १० तर शहांच्या ११ सभा पार पडल्या.कोलकातामध्ये अमित शहा यांच्या रॅलीमध्ये जो हिंसाचार झाला ती उंटावरील शेवटची काडी ठरली. तृणमूल काँग्रेस व भाजपने एकमेकांवर हिंसाचार घडविल्याचे आरोप केले असले तरी मतदार वस्तुस्थिती जाणून होता. त्याने तृणमूल काँग्रेसला जिव्हारी बसेल असा फटका दिला.भाजपचे संघटन पश्चिम बंगालमध्ये मजबूत करण्याची कामगिरी त्या पक्षाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते शिवप्रकाश यांच्यावर २०१५ साली सोपविण्यात आली.पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली एकेक पाऊल उचलण्यात येत होते. त्यानंतरच्या तीन वर्षांत या राज्यामध्ये भाजपच्या मंडलांची संख्या ४१५हून १२८०पर्यंत वाढविण्यात आली.उत्तर बंग, नवदीप, रार बंग, हुगळी मिदनापूर, कोलकाता अशा पाच विभागांत पक्षवाढीसाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू झाले. या कामात संघाचे स्वयंसेवक अरविंद मेनन, ओडिशाचे भाजप नेते सुरेश पुजारी यांचाही सिंहाचा वाटा होता. पण त्याचा गवगवा करणे भाजपने टाळले.>विधानसभेतहीकडवे आव्हाननिवडणुकांत मतांच्या टक्केवारीचे प्रमाण पाहिले तर पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदारसंघांपैकी १६४ मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेसला चांगली मते मिळाली आहेत. भाजपने १२१ विधानसभा मतदारसंघांत मतांची उत्तम बेगमी केली आहे. हे आकडे लक्षात घेता या राज्यात २०२१ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत तृणमूल काँग्रेसचा भाजप हाच मुख्य प्रतिस्पर्धी असेल हे स्पष्ट होते. ग्रामीण भागांबरोबरच शहरी भागांमध्येही भाजप व तृणमूलमध्ये कडवी लढत झाली.>मै नही मानतीसांप्रदायिकता के रंग मे मुझे नही है विश्वाससभी धर्मोमे है उग्रता, नम्रतामै हूं नम्र जागरण की एक सहिष्णू सेविकाउत्थान हुआ जिसका बंगाल मेविश्वास नही मुझे सामयिक उग्र धर्म बेचने मेमेरा विश्वास है मानवता धर्म केआलोक से आलोकित धर्म मेधर्म बेचना है जिनका ताशधर्म पहाड पर है पैसोंका वास?मै रत हूं नीज कर्मोंमेकर्महीन हो तूम सब!इसलिए बिकता है उग्रता धर्म?विश्वास है जिन्हे सहिष्णूता मेआइए जाग्रत कीजिएसमवेत सभी आइएजब वसुधैव कुटुंबकम्तो क्यो है हिसाब-किताब?उग्रता है जिसकी अभिलाषममता बॅनर्जी एक राजकारणी आहेत. तसेच त्या कवयित्री, चित्रकार आणि संगीतज्ञसुद्धा आहेत. निवडणुकांच्या निकालापूर्वी त्यांनी फेसबुकवर स्वत:चा सिंथेसायझर वाजवित असलेला व्हिडीओसुद्धा शेअर केला होता. ‘राजनीती’ शीर्षकाची त्यांची एक कविता खूप चर्चेत होती. ‘मै नही मानती’ या त्यांच्या कवितेवर सुमारे ७ हजार लाइक्स मिळाल्या असून १ हजाराहून अधिक ‘नेटिझन्स’नी या कवितेबद्दल ‘रिट्विट’ केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९West Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Mamata Banerjeeममता बॅनर्जी