शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

झारखंडमधील भाजपचा पराभव नितीश कुमार यांना सुखावणारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 12:28 IST

झारखंडमधील पराभवानंतर भाजपने आपल्या मागण्या मान्य कराव्या, अशी इच्छा नितीश यांची आहे.

नवी दिल्ली - झारखंडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. मात्र भाजपच्या या पराभवामुळे बिहारचे मुख्यमंत्री आणि भाजपचे मित्र असलेले नितीश कुमार आनंदी होणार असल्याचे चित्र आहे. बिहारमध्ये सत्तेत असूनही नितीश यांच्यासाठी भाजपचा झारखंडमधील पराभव सुखावणारा आहे. 

झारखंडमधील पराभवामुळे यापुढे भाजप आपल्या मित्रपक्षांसोबत सामोचराने घेईल, असं त्यांना वाटत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्षांना योग्य तो सन्मान भाजपकडून देण्यात आला नाही. भाजपला एकट्याच्या बळावर देशात बहुमत मिळाल्याने हे झाल्याचा मतप्रवाह आहे. त्यावेळी नितीश यांनी केंद्रात महत्त्वाचे मंत्रीपद मागितले होते. त्यांची ही मागणी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धुडकावून लावली होती. तसेच पटना येथील विश्वविद्यालयाला केंद्रीय विश्वविद्यालय बनविण्याची नितीश यांची मागणी फेटाळून लावली होती. 

दरम्यान झारखंडमधील पराभवानंतर भाजपने आपल्या मागण्या मान्य कराव्या, अशी इच्छा नितीश यांची आहे. झारखंडमध्ये भाजपचा पराभव होण्याचे अनेक कारणं आहेत. पाच वर्षांपूर्वी भाजपकडून झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी गैरआदिवासी असलेले रघुबर दास यांना बसविण्यात आले होते. त्यावेळी विरोधात असलेल्या नितीश यांनी भाजपच्या या निर्णयाला विरोध केला होता. तसेच आदिवासींच्या राज्यात हा आदिवासींवर अन्याय असल्याचे म्हटले होते.