शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अब की बार 250च्या पार; भाजपाला अनुकूल सट्टा बाजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 13:23 IST

सत्ता बाजारात भाजपाची हवा; काँग्रेसला धक्का बसण्याचा अंदाज

जैसलमेर: सध्या देशातील सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, याची आकडेवारी 23 मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालानंतर पुढे येईल. मात्र सध्या सट्टा बाजारानं भाजपाला कौल दिला आहे. येत्या निवडणुकीत भाजपाला 250 पेक्षा अधिक जागा मिळतील, असा अंदाज सट्टा बाजाराकडून वर्तवण्यात येत आहे. भाजपाच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला 300 हून अधिक जागांवर विजय मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. राजस्थानच्या जैसलमेरमधील सट्टा बाजारानुसार काँग्रेसला देशात आणि राज्यातही फारसं यश मिळणार नाही. काँग्रेसला 100 जागा मिळतील, असा अंदाज आधी व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता काँग्रेसला केवळ 72 ते 74 जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेल्याच वर्षी विधानसभा निवडणूक जिंकणाऱ्या काँग्रेसला राज्यात धक्का बसेल, असा अंदाज आहे. राजस्थानातून एकूण 25 खासदार लोकसभेत जातात. यातील 18 ते 20 जागांवर भाजपाला यश मिळू शकतं. गेल्याच महिन्यात पुलवामात दहशतवादी हल्ला झाला. यानंतर हवाई दलानं बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केला. हवाई दलाच्या या धडाकेबाज कारवाईचा फायदा सत्ताधारी पक्षाला होऊ शकतो. या कारवाईमुळे मोदी सरकारला अनुकूल वातावरण निर्माण झालं. पंतप्रधान मोदींचं नेतृत्व अतिशय सक्षम असल्याची भावना मतदारांमध्ये निर्माण झाल्याचं सट्टा बाजारातील बुकी सांगतात. एअर स्ट्राइकच्या आधी सट्टा बाजारातील बुकींनी भाजपाला 200 हून अधिक, तर एनडीएला 280च्या आसपास जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केला होता.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसindian air forceभारतीय हवाई दलIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक