शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

भारताची जमीन कोणी चीनला दिली, हे राहुल गांधींनी आजोबांना विचारावं; भाजपचा पलटवार

By देवेश फडके | Updated: February 12, 2021 16:24 IST

भारत-चीनमध्ये सीमेवरून झालेल्या समेटावर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) पलटवार केला आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींवर भाजपची जोरदार टीकाराहुल गांधींच्या टीकेचा भाजपकडून खरपूस समाचारराहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा टीकास्त्र

नवी दिल्ली : भारत आणि चीन सीमेवरून समेट झाल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्यानंतर आता विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरट असून, ते चीनचा सामना करू शकले नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्याला भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) प्रत्युत्तर देण्यात आले आहे. (bjp counterattack on rahul gandhi on india china border dispute)

भारताची जमीन चीनला कोणी दिली? हे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपले आजोबा म्हणजेच देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना विचारावे. राहुल गांधींना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल. कोण देशभक्त आहे आणि कोण नाही, हेही राहुल गांधीना समजेल. जनतेला सर्व काही माहिती आहे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. 

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर सरकारचा पलटवार; केंद्रीय मंत्री म्हणाले 'कुंदबुद्धी' पप्पू

राहुल गांधींमध्ये परिपक्वतेचा अभाव

राहुल गांधी यांच्या विधानातून असंसदीयपणा आणि परिपक्तवतेचा अभाव दिसून येते, अशी टीका केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी केली आहे. राहुल गांधींना काही समजत नाही आणि ते समजून घेण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत नाहीत, असा दावाही सिंह यांनी केला.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय भूमीचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले. चीनसाठी त्यांनी भारताची जमीन सोडून दिली. पंतप्रधान मोदी घाबरट असून, ते चीनचा सामना करू शकले नाहीत. आपल्या लष्कराच्या बलिदानाचा त्यांनी विश्वासघात केला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

दरम्यान, राहुल गांधी यांनी भारत-चीन डिसएंगेजमेन्टवर दिलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे की, कुंदबुद्धी पप्पूजींच्या कमालीचा कुठलाही रस्ता नाही. सुपारी घेऊन देशाला बदनाम करण्याचे षड्यंत्र आणि संरक्षण दलाचे मनोबल तोडण्याच्या प्रयत्नात ते आहेत. त्यावर काही उपचार नाही, असा गंभीर आरोप मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीindia china faceoffभारत-चीन तणाव