शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

भारताची जमीन कोणी चीनला दिली, हे राहुल गांधींनी आजोबांना विचारावं; भाजपचा पलटवार

By देवेश फडके | Updated: February 12, 2021 16:24 IST

भारत-चीनमध्ये सीमेवरून झालेल्या समेटावर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर मोठा आरोप केला आहे. यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) पलटवार केला आहे.

ठळक मुद्देराहुल गांधींवर भाजपची जोरदार टीकाराहुल गांधींच्या टीकेचा भाजपकडून खरपूस समाचारराहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा टीकास्त्र

नवी दिल्ली : भारत आणि चीन सीमेवरून समेट झाल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्यानंतर आता विरोधकांकडून सरकारवर टीका केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरट असून, ते चीनचा सामना करू शकले नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्याला भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) प्रत्युत्तर देण्यात आले आहे. (bjp counterattack on rahul gandhi on india china border dispute)

भारताची जमीन चीनला कोणी दिली? हे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपले आजोबा म्हणजेच देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना विचारावे. राहुल गांधींना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल. कोण देशभक्त आहे आणि कोण नाही, हेही राहुल गांधीना समजेल. जनतेला सर्व काही माहिती आहे, असे केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. 

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर सरकारचा पलटवार; केंद्रीय मंत्री म्हणाले 'कुंदबुद्धी' पप्पू

राहुल गांधींमध्ये परिपक्वतेचा अभाव

राहुल गांधी यांच्या विधानातून असंसदीयपणा आणि परिपक्तवतेचा अभाव दिसून येते, अशी टीका केंद्रीय मंत्री आर. के. सिंह यांनी केली आहे. राहुल गांधींना काही समजत नाही आणि ते समजून घेण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत नाहीत, असा दावाही सिंह यांनी केला.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय भूमीचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले. चीनसाठी त्यांनी भारताची जमीन सोडून दिली. पंतप्रधान मोदी घाबरट असून, ते चीनचा सामना करू शकले नाहीत. आपल्या लष्कराच्या बलिदानाचा त्यांनी विश्वासघात केला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

दरम्यान, राहुल गांधी यांनी भारत-चीन डिसएंगेजमेन्टवर दिलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे की, कुंदबुद्धी पप्पूजींच्या कमालीचा कुठलाही रस्ता नाही. सुपारी घेऊन देशाला बदनाम करण्याचे षड्यंत्र आणि संरक्षण दलाचे मनोबल तोडण्याच्या प्रयत्नात ते आहेत. त्यावर काही उपचार नाही, असा गंभीर आरोप मुख्तार अब्बास नक्वी यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीindia china faceoffभारत-चीन तणाव