शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

भाजप खासदारांचे टेन्शन वाढणार! २०२४ मध्ये 'या' नेत्यांचा पत्ता होणार कट, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 13:12 IST

खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीचा वापर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

देशात लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यात होणार आहेत. सर्व पक्षांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे. सध्याच्या खासदारांची कामगिरी आणि लोकप्रियता यांचे सर्वेक्षण करणे हा तयारीचा महत्त्वाचा भाग आहे, याच्या आधारे त्यांना पुढे संधी दिली जाईल. खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय पक्ष आपली वैयक्तिक यंत्रणाही वापरत आहे. लोकहिताच्या योजना खासदार कशा पद्धतीने राबवत आहेत आणि जनतेमध्ये संवाद कसा आहे, हे दोन निकष सर्वात महत्त्वाचे आहेत, याच्या आधारे ते आताच्या खासदारांनाच दुसरी संधी दिली जाणार आहे.

'अनिल बोंडेना मिनिस्ट्री मिळावी म्हणून ही भानगड'; यशोमती ठाकुरांना दाभोळकर करण्याची धमकी

खासदार सोशल मीडियावर किती सक्रिय आहेत आणि जनतेशी कसा संवाद आहे. हे देखील त्यांच्या कामगिरीच्या सर्वेक्षणाचा आधार असणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए यावेळी भारतातील २६ पक्षांच्या एकजुटीने लढत आहे. याशिवाय आतापर्यंत राज्यसभेचे सदस्य राहिलेल्या अशा अनेक केंद्रीय मंत्र्यांना निवडणुकीच्या मोसमात उतरवण्याची तयारी सुरू आहे. मात्र, त्यांना रिंगणात उतरवण्यापूर्वी त्या जागेचे सामाजिक समीकरण आणि नेत्याची लोकप्रियताही पाहायला मिळणार आहे. २०१९ मध्येही भाजपने याच सूत्रावर काम केले होते. त्यानंतर राज्यसभेचे सदस्य असलेल्या रविशंकर प्रसाद, हरदीप सिंग पुरी आणि स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली.

याचा सर्वात मोठा फायदा भाजपला अमेठीमध्ये झाला, तिथे राहुल गांधींचा स्मृती इराणींविरुद्ध पराभव झाला. भाजपने आधीच देशातील अशा १६६ जागांवर लक्ष केंद्रित केले आहे, तिथे ते स्वत:ला कमकुवत समजतात. काही ठिकाणी भाजप वयाचा विचार करून उमेदवार बदलू शकते. अशा जागांवर लोकप्रिय आमदारांना संधी मिळू शकते. यूपीमध्ये भाजप या फॉर्म्युल्यावर काम करू शकते. बरेली, प्रयागराज, कानपूर या जागांवरून उमेदवार बदलण्याची चर्चा आहे.2019 मध्ये पहिल्यांदा खासदार झालेल्या 158 पैकी 55 जणांना भाजपने दुसरी संधी दिली नाही. तेव्हा पक्षनेतृत्वाने सांगितले की, मोदी लाटेत हे लोक जिंकले, पण आपला प्रभाव सोडू शकले नाहीत. 

उत्तर प्रदेशमध्ये भाजपने शाहजहांपूरमधून कृष्णा राज, आग्रामधून रामशंकर कथेरिया आणि फतेहपूर सिक्रीमधून चौधरी बाबुलाल यांना हटवले. बीसी खुंद्री आणि भगतसिंग कोश्यारी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना उत्तराखंडमध्ये संधी मिळाली नाही. वयाच्या आधारावर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कलराज मिश्रा, कारिया मुंडा, शांता कुमार या दिग्गज नेत्यांना भाजपने संधीही दिली नाही. यापैकी बहुतेकांना नंतर राज्यपालांसारखी महत्त्वाची पदे देण्यात आली.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी