शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

भाजप खासदारांचे टेन्शन वाढणार! २०२४ मध्ये 'या' नेत्यांचा पत्ता होणार कट, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 13:12 IST

खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीचा वापर केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

देशात लोकसभेच्या निवडणुका काही महिन्यात होणार आहेत. सर्व पक्षांनी लोकसभेची तयारी सुरू केली आहे. सध्याच्या खासदारांची कामगिरी आणि लोकप्रियता यांचे सर्वेक्षण करणे हा तयारीचा महत्त्वाचा भाग आहे, याच्या आधारे त्यांना पुढे संधी दिली जाईल. खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी वेगवेगळ्या एजन्सीचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय पक्ष आपली वैयक्तिक यंत्रणाही वापरत आहे. लोकहिताच्या योजना खासदार कशा पद्धतीने राबवत आहेत आणि जनतेमध्ये संवाद कसा आहे, हे दोन निकष सर्वात महत्त्वाचे आहेत, याच्या आधारे ते आताच्या खासदारांनाच दुसरी संधी दिली जाणार आहे.

'अनिल बोंडेना मिनिस्ट्री मिळावी म्हणून ही भानगड'; यशोमती ठाकुरांना दाभोळकर करण्याची धमकी

खासदार सोशल मीडियावर किती सक्रिय आहेत आणि जनतेशी कसा संवाद आहे. हे देखील त्यांच्या कामगिरीच्या सर्वेक्षणाचा आधार असणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए यावेळी भारतातील २६ पक्षांच्या एकजुटीने लढत आहे. याशिवाय आतापर्यंत राज्यसभेचे सदस्य राहिलेल्या अशा अनेक केंद्रीय मंत्र्यांना निवडणुकीच्या मोसमात उतरवण्याची तयारी सुरू आहे. मात्र, त्यांना रिंगणात उतरवण्यापूर्वी त्या जागेचे सामाजिक समीकरण आणि नेत्याची लोकप्रियताही पाहायला मिळणार आहे. २०१९ मध्येही भाजपने याच सूत्रावर काम केले होते. त्यानंतर राज्यसभेचे सदस्य असलेल्या रविशंकर प्रसाद, हरदीप सिंग पुरी आणि स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली.

याचा सर्वात मोठा फायदा भाजपला अमेठीमध्ये झाला, तिथे राहुल गांधींचा स्मृती इराणींविरुद्ध पराभव झाला. भाजपने आधीच देशातील अशा १६६ जागांवर लक्ष केंद्रित केले आहे, तिथे ते स्वत:ला कमकुवत समजतात. काही ठिकाणी भाजप वयाचा विचार करून उमेदवार बदलू शकते. अशा जागांवर लोकप्रिय आमदारांना संधी मिळू शकते. यूपीमध्ये भाजप या फॉर्म्युल्यावर काम करू शकते. बरेली, प्रयागराज, कानपूर या जागांवरून उमेदवार बदलण्याची चर्चा आहे.2019 मध्ये पहिल्यांदा खासदार झालेल्या 158 पैकी 55 जणांना भाजपने दुसरी संधी दिली नाही. तेव्हा पक्षनेतृत्वाने सांगितले की, मोदी लाटेत हे लोक जिंकले, पण आपला प्रभाव सोडू शकले नाहीत. 

उत्तर प्रदेशमध्ये भाजपने शाहजहांपूरमधून कृष्णा राज, आग्रामधून रामशंकर कथेरिया आणि फतेहपूर सिक्रीमधून चौधरी बाबुलाल यांना हटवले. बीसी खुंद्री आणि भगतसिंग कोश्यारी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना उत्तराखंडमध्ये संधी मिळाली नाही. वयाच्या आधारावर लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कलराज मिश्रा, कारिया मुंडा, शांता कुमार या दिग्गज नेत्यांना भाजपने संधीही दिली नाही. यापैकी बहुतेकांना नंतर राज्यपालांसारखी महत्त्वाची पदे देण्यात आली.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी