शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

‘आरबीआयला भाजपा आपला विभागच समजते’ - पी. चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 04:27 IST

भाजपाचे सरकार रिझर्व्ह बँकेला देशाची मध्यवर्ती बँक आणि स्वायत्त संस्था न मानता आपला एक विभागच समजते व त्याचप्रमाणे तिचा उपयोग व्हावा, असे त्याला वाटते, असे स्पष्ट मत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले.

भाजपाचे सरकार रिझर्व्ह बँकेला देशाची मध्यवर्ती बँक आणि स्वायत्त संस्था न मानता आपला एक विभागच समजते व त्याचप्रमाणे तिचा उपयोग व्हावा, असे त्याला वाटते, असे स्पष्ट मत माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी व्यक्त केले.भाजपाला जे हवे होते ते न केल्यामुळे ऊर्जित पटेल यांना रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा राजीनामा द्यावा लागला. नूतन गव्हर्नर शक्तिकांत दास हे आपण अर्थ मंत्रालयातील माजी सचिव आहोत हे विसरून काम करतील व रिझर्व्ह बँकेची प्रतिष्ठा टिकवतील, अशी आशा व्यक्त करून ते म्हणाले, सार्वजनिक बँकांमध्ये झालेले कर्ज घोटाळे व वसूल न होणाऱ्या कर्जाबद्दल काँग्रेसवर सतत टीका होते. एक घोटाळा यशवंत सिन्हा असताना व दुसरा संयुक्त पुरोगामी आघाडीचे सरकार असताना झाला. त्यावेळी जागतिक परिस्थिती चांगली होती. रुपयाचा दर व बाजारही योग्य होता. यूपीएच्या काळातील वसूल न झालेल्या कर्जाबद्दल बोलायचे तर तेव्हा जागतिक मंदी होती हे लक्षात ठेवावे लागेल. बाजार प्रतिकूल होता. कर्ज फेडण्यासाठी उद्योगांकडे पैसे नव्हते. जर कुणी ठरवून कर्ज फेडत नसेल तर तो गुन्हा आहे. यूपीए आणि यशवंत सिन्हा यांची कारकिर्द योग्यरीत्या समजून घेतली गेली तर भाजपाचा खोटारडेपणा समोर येईल. भाजपा सिन्हा यांच्या कारकिर्दीतील एनपीएबद्दल काहीच का बोलत नाही?जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीवर चिदंबरम म्हणाले, खोºयातील परिस्थितीवर दिलीप पाडगावकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल संसदेत सादर करू न शकल्याबद्दल मला खेद होतोय. काश्मीर प्रश्नाचे उत्तर हे संवाद व चर्चाच आहे. हे धोरण आम्ही अवलंबले होते. भाजपा सरकारने शक्तीच्या प्रयोगांनी काश्मीर प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. तो योग्य नाही. काश्मीरचा प्रश्न जेव्हा अस्फा, विशेष कायद्यात दुरुस्त्या केल्या जातील तेव्हाच सुटू शकेल हे मी पुन्हा पुन्हा सांगेन. माझा पक्षही माझ्या विचारांशी पूर्णपणे सहमत नसेल हेही मला माहिती आहे. पण मी माझ्या विचारांवर ठाम आहे, असे ते म्हणाले.तीन राज्यांतील काँग्रेसच्या विजयाचे श्रेय नोटाबंदीमुळे लोकांमध्ये आलेल्या नैराशाला आहे. भाजपा खोटे बोलला हे त्यांना समजले. नोटाबंदीचे परिणाम हे टप्प्याटप्प्याने दिसतील हे मी त्या निर्णयानंतर अवघ्या सात तासांत सांगितले होते. त्यानंतर लगेचच उत्तर प्रदेशात निवडणुका झाल्या व त्याचमुळे त्याचा परिणाम तेव्हा दिसला नाही. त्याचा प्रचार असा केला गेला की, लोकांवर नोटाबंदीचा काही परिणाम झाला नाही. आर्थिक बाबतीत परिणाम नंतर होतात हे समजून घेतले पाहिजे. नोटांबदीनंतर विदेशी गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक बंद केली व भारतीय गुंतवणूकदारांनी विदेशात पैसे गुंतवायला सुरुवात केली. यामुळे नोकºया कमी निर्माण झाल्या. आता तो परिणाम दिसत आहे.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात छान उत्साह समोर आला आहे व आम्ही जिंकलो. ही वेळ भाजपासाठी आत्मचिंतनाची आहे असेही ते म्हणाले.या निवडणुकीत राहुल गांधी यांना त्यांची जात का सांगावीशी वाटली, या प्रश्नावर चिदंबरम म्हणाले, तो मुद्दा प्रसारमाध्यमांनी निवडणुकीत बनवला. त्यांनी जात सांगितली नाही. पुरोहिताने त्यांना विचारल्यावर तो मुद्दा समोर आला. लोकसभा निवडणुकीनंतर गांधी पंतप्रधानपदाचे दावेदार असतील का यावर चिदंबरम म्हणाले, ते तर निकालानंतर ठरेल व वेगवेगळ््या पक्षांवर ते अवलंबून असेल.मी नेहमी हे सांगत आलो आहे की, १०-१२ राज्यांत प्रादेशिक पक्ष चांगली कामगिरी करणार असतील तर किमान १० राज्यांत काँग्रेसची कामगिरी चांगली असेल. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष व बहुजन समाज पक्ष, तामिळनाडूत द्रमुक चांगली कामगिरी करतील. आम्हाला याच आधारावर पुढे जायचे आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी पुढे असतील. निकालानंतर पंतप्रधानपदावर चर्चा होईल. जो मोठा पक्ष असेल व ज्याची कामगिरी चांगली असेल त्यावर चर्चा होईल. सगळे मित्र पक्ष मिळून चर्चा होईल व त्यानंतर निर्णय.अयोध्येतील राममंदिरासाठी भाजपा अध्यादेश किंवा कायदा करणार असेल तरी काँग्रेसला विजयाची खात्री आहे का, असे विचारल्यावर चिदंबरम म्हणाले, असे सगळे अंदाज चुकले आहेत. भाजपाला निवडणुकीच्या वेळेसच रामाची आठवण येते. काहीही करून निवडणुका जिंकायच्या हाच भाजपाचा हेतू आहे. परंतु, यावेळी लोक स्वत:चे वाईट दिवस येऊ देणार नाहीत.च्शब्दांकन : संतोष ठाकूरमुलाखत : बरखा दत्त

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमIndiaभारतBJPभाजपा