शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

१० दिवसांनंतरही दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री ठरेना; आज नेता निवडीसाठी बैठक होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 10:23 IST

पक्षाच्या निरीक्षकांची नावे कधीही घोषित होण्याची शक्यता आहे. भाजप प्रमुख जे. पी. नड्डा आणि ज्येष्ठ नेते कोणत्याही क्षणी पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे.

हरीश गुप्ता

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने ७० पैकी ४८ जागा जिंकल्या असून, दहा दिवसांनंतरही दिल्लीचा मुख्यमंत्री ठरलेला नाही. दिल्लीतील १० वर्षांची ‘आप दा’ दूर करीत भाजपने ही निवडणूक जिंकली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यानंतर एव्हाना भाजपने मुख्यमंत्रिपदावर निवड करीत सरकार सुरू करणे अपेक्षित होते. परंतु ८ फेब्रुवारी रोजी निकाल लागल्यानंतर अद्यापही मुख्यमंत्र्यांची निवड झालेली नाही.

पक्षाच्या निरीक्षकांची नावे कधीही घोषित होण्याची शक्यता आहे. भाजप प्रमुख जे. पी. नड्डा आणि ज्येष्ठ नेते कोणत्याही क्षणी पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे. निरीक्षक हे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करतील आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत आमदारांची मते जाणून घेतील.

दिल्ली भाजप प्रमुख वीरेंद्र सचदेवा यांनी म्हटले आहे की, भाजपमध्ये मुख्यमंत्री पदाची निवड ही एक लोकशाही प्रक्रिया आहे. केंद्रीय नेतृत्व निरीक्षक पाठवतील व निर्णय घेतला जाईल.  सोमवारी भाजप आमदार त्यांचा नेता निवडण्यासाठी बैठक घेणार आहेत.

मुख्यमंत्री कोण होणार?

जाट नेते प्रवेश वर्मा यांना मुख्यमंत्री करावे, असा आग्रह धरणारा भाजप आमदारांत एक मजबूत गट आहे. कारण, या निवडणुकीत प्रथमच १० जाट नेते विजयी झाले आहेत. दलित मुख्यमंत्र्यांची निवड करावी, असे मानणाराही एक गट आहे.

दिल्लीत १२ एससी जागांपैकी भाजपने केवळ ४ जागा जिंकल्या आहेत व या पक्षाचा या वर्गाचा जनाधार वाढवण्यासाठी हे आवश्यक आहे, असे त्यांना वाटते. भाजपने कोणत्याही राज्यात दलित मुख्यमंत्री नियुक्त केलेला नाही. त्यामुळे हाही एक प्रबळ मतप्रवाह आहे.

टॅग्स :delhiदिल्लीBJPभाजपा