शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

केंद्रीय मंत्रिमंडळात बदलाचे वारे? जेपी नड्डा यांची कॅबिनेट मंत्र्यांसोबत मॅरेथॉन बैठक; UCC वर सुद्धा चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 12:05 IST

सर्वात आधी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि भूपेंद्र यादव यांच्यासोबत बैठक सुरू झाली.

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांची जोरदार चर्चा आहे. यातच भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मंगळवारी दुपारपासून रात्रीपर्यंत अनेक केंद्रीय मंत्र्यांची बैठक घेतली. सर्वात आधी केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि भूपेंद्र यादव यांच्यासोबत बैठक सुरू झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही कॅबिनेट मंत्र्यांनी संघटना मंत्री बीएल संतोष यांच्या उपस्थितीत जेपी नड्डा यांची भेट घेतली. ही बैठक प्रामुख्याने संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात, विशेषत: समान नागरी संहिता (UCC) मध्ये उपस्थित करण्यात येणाऱ्या मुद्द्यांवर होती. संसदेत यूसीसी तयारीबाबत सविस्तर चर्चा झाली.

या दोन्ही मंत्र्यांची बैठक आटोपल्यानंतर जेपी नड्डा यांनी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, किरेन रिजिजू यांच्यासोबत झालेल्या बैठकीत संसदेत उपस्थित करावयाच्या विषयांवर विशेषत: यूसीसीच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. किरेन रिजिजू यांनी यापूर्वीच कायदा मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारली असल्याने जेपी नड्डा यांनी त्यांच्याशी यूसीसीच्या मुद्द्यावर येणाऱ्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.

किरेन रिजिजू यांची भेट घेतल्यानंतर विद्यमान केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी भाजप अध्यक्षांची भेट घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, जेपी नड्डा यांनी मेघवाल यांच्याशीही यूसीसीशी संबंधित विषयांवर सल्लामसलत केली. दरम्यान, माजी कायदा राज्यमंत्री एसपी सिंह बघेल हेही भाजप मुख्यालयात पोहोचले. शेवटी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजप मुख्यालय गाठून भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली आणि त्यांची भेट सुमारे तासभर चालली.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आगामी पावसाळी अधिवेशनात येणार्‍या विषयांबाबत आणि त्याबाबतच्या ठोस तयारीसाठी आजची बैठक सुमारे ८ तास चालली. आगामी पावसाळी अधिवेशनात यूसीसी आणि एनसीआर विधेयकासारख्या मोठ्या मुद्द्यांवरून संसदेचे वातावरण तापणार आहे, त्यामुळे या सर्व ज्वलंत मुद्द्यांवर भाजपच्या तयारीच्या संदर्भात आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीसांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यतापीटीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री  आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे. पीटीआयने भाजपच्या सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय घेतील, तेव्हा मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची शक्यता आहे. २०  जुलैपासून सुरू होणार्‍या संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी हे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यात बंद दाराआड बैठकराज्यांसह भाजपच्या पक्षामध्ये  काही बदल  होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २८ जून रोजी अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत बैठक घेतली होती. संघटनात्मक आणि राजकीय घडामोडींचा आढावा घेण्यासाठी अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यात बंद दाराआड बैठक झाली होती. कारण मंत्रिमंडळातील कोणताही फेरबदल आगामी विधानसभा निवडणुकीतही परिणामकारक ठरणार आहे. 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह