शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

'...तर ११ फेब्रुवारीला पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करू'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 15:56 IST

भाजपा उमेदवार तेजिंदरसिंग पाल बग्गा यांचं विधान

नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात गेल्या महिन्याभरापेक्षा जास्त कालावधीपासून आग्नेय दिल्लीतल्या शाहीन बागेत आंदोलन सुरू आहे. या आंदोलनावर भाजपाच्या अनेक नेत्यांनी टीका केली आहे. आता भाजपाच्या उमेदवारानं शाहीन बागेत थेट सर्जिकल स्ट्राईक करण्याचा इशारा दिला आहे. ११ फेब्रुवारीला शाहीन बागेत सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल, असं भाजपा नेते आणि उमेदवार ताजिंदरपाल सिंग बग्गा यांनी म्हटलं आहे. सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात शाहीन बागेत मुस्लिम महिलांचं आंदोलन सुरू आहे. महिन्याभराहून जास्त कालावधीपासून या महिला आंदोलन करत आहेत. या आंदोलनावर भाजपाच्या अनेक नेत्यांनी जोरदार टीका केली आहे. तर भाजपा नागरी मुद्द्यांपासून पळ काढण्यासाठी शाहीन बागेतल्या आंदोलनाचा राजकीय वापर करत असल्याचं प्रत्युत्तर आम आदमी पार्टीकडून देण्यात आलं आहे. भाजपाचे नेते जनसभांमधून शाहीन बागेतल्या आंदोलनावर टीका करत असताना ताजिंदरपाल सिंग बग्गा यांनी आंदोलकांवर थेट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर शाहीन बागेत सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल, असा इशारा बग्गा यांनी दिला आहे. शाहीन बागेतल्या आंदोलकांचं समर्थक जंतरमंतरवर भारतीय सैन्याची तुलना पाकिस्तानी सैन्याशी करत असल्याचा एक व्हिडीओ बग्गा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. 'भारतीय सैन्य आपल्याच लोकांना मारतं, असं शाहीन बाग आंदोलनाचे समर्थक जंतरमंतरवर म्हणतात. त्यांच्याकडून भारतीय सैन्याची तुलना पाकिस्तानी लष्कराशी केली जाते. शाहीन बाग देशद्रोह्यांचा अड्डा झाली आहे. ११ तारखेला निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यावर सर्वात आधी या अड्ड्यावर सर्जिकल स्ट्राईक करण्यात येईल,' असं बग्गा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. याआधी भाजपा नेते परवेश वर्मा यांनी शाहीन बागेतल्या आंदोलनावर भाष्य करताना वादग्रस्त विधान केलं होतं. 'शाहीनबाग हे काश्मीर झालं आहे. भाजपा सत्तेत आली नाही, तर ते तुमच्या घरात घुसतील, तुमच्या मुलीला-बहिणीला उचलून नेतील, त्यांच्यावर बलात्कार करतील आणि मारून टाकतील' असं भाजपा खासदार परवेश वर्मा म्हणाले होते. दिल्लीत भाजपा सत्तेत आल्यास, एका तासात शाहीनबाग रिकामी करू, असंदेखील वर्मा यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाAAPआप