शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

"पक्षाचा पाठिंबा नाही, फोनही उचलत नाही, माघार घ्यायची नव्हती पण.."; BJP उमेदवाराने केले आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 23:47 IST

BJP Mumtaz Ali : पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा नसल्याचं सांगत आपली उमेदवारी आता मागे घेतली आहे. हा भाजपासाठी एक धक्का मानला जात आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये कोलकाता महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत भाजपा उमेदवार मुमताज अली (BJP Mumtaz Ali) यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा नसल्याचं सांगत आपली उमेदवारी आता मागे घेतली आहे. हा भाजपासाठी एक धक्का मानला जात आहे. पक्षाने आपल्याला पाठींबा दिला नाही. तसेच फोन केला तर त्याचंही उत्तर दिलं जात नाही त्यामुळे हा निर्णय घेत असल्याचं अली यांनी म्हटलं आहे. "मला निवडणुकांमधून माघार घ्यायची नव्हती. पण ज्या दिवशी मी माझा उमेदवारी अर्ज भरायला गेले, तेव्हा माझ्या निवडणूक प्रतिनिधीशिवाय पक्षातील कोणीही उपस्थित नव्हतं" अशी माहिती मुमताज अली यांनी दिली आहे. 

अली यांनी "आमच्या पक्ष नेतृत्वाने माझ्या फोनला प्रतिसाद दिला नाही. अर्ज छाननीच्या दिवशी मी एकटीच गेले होते. त्यादिवशी तर माझा निवडणूक प्रतिनिधीही गैरहजर होता. जेव्हा मी इतर पक्षांचे उमेदवार त्यांच्या समर्थकांसह येताना पाहिले तेव्हा मला खूप वाईट वाटले. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी ऑफिसमध्येही शिरले नाही. एका हवालदाराला उमेदवारी अर्ज कसा मागे घ्यावा, असे विचारले. त्यानंतर मी दुपारपर्यंत पक्षाकडून प्रतिसाद येण्याची वाट पाहिली आणि अखेर माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला" असं म्हटलं आहे. 

"स्वत:च्या उमेदवारांची कल्पना नाही"

"बंगालच्या भाजपा नेतृत्वाला आपण निवडणुकीतून माघार घेतली हे माहीत देखील नव्हते. माध्यमातून बातमी मिळाल्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी मला फोन केला. भाजपा महिला मोर्चाच्या प्रमुख अग्निमित्र पॉल यांनी मला फोन केला आणि मुमताज दादा घरी आहेत का, अशी विचारणा केली. महिला असूनही त्यांनी उमेदवाराला दादा म्हटले. त्यांना स्वत:च्या उमेदवारांची कल्पना नाही. त्यामुळे ते आम्हाला किती महत्त्व देतात याची तुम्ही कल्पना करू शकता" असं म्हणत मुमताज अली यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

"मी भाजपात किती काळ टिकू शकेन याची खात्री नाही; कामाची संधी मिळेल त्या पक्षात जाईन"

आगामी कोलकाता महानगरपालिका निवडणुकीसाठी अली प्रभाग 134 मधून बंगाल भाजपाच्या उमेदवार होत्या. उमेदवारी दाखल केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी त्यांनी आपल्या पक्षाकडून पाठिंबा नसल्यामुळे माघार घेतली. "मला जाणूनबुजून अशा जागेवर निवडणूक लढवायला पाठवले जिथे मला 10 मतेही मिळणार नाहीत. मला खूप असहाय्य वाटतंय. मला मदत करण्यासाठी इथे कोणीही नाही. मी या पक्षात किती काळ टिकू शकेन याची मला खात्री नाही. जो पक्ष मला काम करण्याची संधी देईल, मी त्या पक्षात जाईन" असं देखील मुमताज अली यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाwest bengalपश्चिम बंगालPoliticsराजकारण