Video:अविवाहित कार्यकर्त्यांनो काश्मीरात जा अन् गोऱ्या मुलीशी लग्न करा; भाजपा आमदाराचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 10:33 AM2019-08-07T10:33:42+5:302019-08-07T10:35:56+5:30

मोदी यांनी आपल्या सगळ्याचं स्वप्न साकार केलं आहे.

Bjp Bachelors Can Marry Gori Kashmiri Girls Without Any Fear Says Bjp Mla Vikram Saini | Video:अविवाहित कार्यकर्त्यांनो काश्मीरात जा अन् गोऱ्या मुलीशी लग्न करा; भाजपा आमदाराचं विधान

Video:अविवाहित कार्यकर्त्यांनो काश्मीरात जा अन् गोऱ्या मुलीशी लग्न करा; भाजपा आमदाराचं विधान

Next

मुजफ्फरनगर - नेहमी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे भाजपा आमदार विक्रम सिंह सैनी यांनी पुन्हा एकदा कलम 370 हटवल्यानंतर विवास्पद प्रतिक्रिया दिली आहे. विक्रम सिंह सैनी यांनी सांगितले की, देशातील मुस्लिमांना या निर्णयामुळे आनंद व्हायला हवा कारण आता त्यांना न घाबरता गोऱ्या काश्मिरी मुलींसोबत लग्न करता येणार आहे. इतकचं नाही तर भाजपाच्या अविवाहित युवा नेतेही काश्मीरला जाऊन प्लॉट विकत घेऊ शकतील आणि लग्न करु शकतील असं विधान भाजपा आमदाराने केले आहे. 

मुजफ्फरनगरच्या कार्यक्रमात बोलताना भाजपा आमदार विक्रम सिंह सैनी म्हणाले की, मोदी यांनी आपल्या सगळ्याचं स्वप्न साकार केलं आहे. भाजपाचे अविवाहित नेते आहेत त्यांना काश्मीरला जाऊन लग्न करता येईल यात आमची कोणतीही अडचण नाही. भाजपाच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनाही काश्मीरच्या गोऱ्या मुलींसोबत लग्न करता येईल असं त्यांनी सांगितले. 

कठौली येथे कलम 370 हटविण्याच्या मोदी सरकारच्या ऐतिहासिक निर्णयावर जल्लोष करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते जमले होते. सैनी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं. यापूर्वीही सैनी यांनी एका कार्यक्रमात बोलताना ज्यांना भारतात राहायला भीती वाटत असेल अशांना बॉम्बने उडविले पाहिजे तसेच या लोकांनी देश सोडून जायला हवं असं वादग्रस्त विधान केलं होतं. 

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. तसेच जम्मू काश्मीर पूनर्रचना विधेयक आणून त्या राज्याला केंद्रशासित राज्य म्हणून जाहीर केलं. तसेच लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित राज्य निर्माण करण्यात आलं. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा अस्तित्वात असेल तर लडाखमध्ये विधानसभा अस्तित्वात नसेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून सांगण्यात आलं. 

कलम 370 हटविल्यानंतर देशभरात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव केलं गेलं. मात्र या निर्णयावरुन काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं. 
 

Web Title: Bjp Bachelors Can Marry Gori Kashmiri Girls Without Any Fear Says Bjp Mla Vikram Saini

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.