शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Atul Bhatkhalkar : "आता काँग्रेसचा राग येत नाही तर कीव करावीशी वाटते"; भाजपा नेत्याचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2022 10:39 IST

BJP Atul Bhatkhalkar Slams Congress : भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

गुजरातमध्ये राजकीय पक्षांचा प्रचार जोरात सुरू आहे. भाजपा आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते सतत रॅली आणि सभा घेत आहेत. काँग्रेसनेही आपला प्रचार सुरू ठेवला आहे. काँग्रेसचे बडे नेते गुजरातमध्ये क्वचितच जाताना दिसतात. पण याच दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी बुधवारी हैदराबादमध्ये बोलताना गुजरातच्या निवडणुकांचा मुद्दा मांडला. आम आदमी पार्टी (AAP) हा वेगळा पक्ष नाही, तो भाजपचाच मित्रपक्षच आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक (RSS) ची फ्रंट ऑर्गनायझेशन असलेल्या इंडिया अगेन्स्ट करप्शन या संस्थेतून २०१२ मध्ये त्यांचा जन्म झाला, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. यावरून आता भाजपाने काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे. 

"आता काँग्रेसचा राग येत नाही तर कीव करावीशी वाटते" असं म्हणत भाजपा नेत्याने निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "सत्ता प्राप्तीच्या लालसेपोटी काँग्रेस अशी बेताल वक्तव्य करून अधिकच गाळात रुतत चालली आहे... आता काँग्रेसचा राग येत नाही तर कीव करावीशी वाटते... Congress ला चळ लागले आहे…" असं अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

“गुजरातमध्ये खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच"

"भाजपा आणि आम आदमी पक्षाचे मुद्दे आणि भाषा जवळपास सारखीच आहे. दोघेही कधी एकमेकांविरुद्ध बोलले तर तो केवळ दिखाव्यासाठी राजकीय हल्ला असतो. आम आदमी पार्टी मीडियामध्ये भरपूर जाहिराती देत ​​आहे, मीडियामध्ये आपच्या जाहिराती भरलेल्या आहेत. पण वास्तविकता काही औरच आहे. गुजरातमध्ये खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे. आम आदमी पार्टी काँग्रेसची मते कमी करण्यासाठी आणि भाजपाला मदत करण्यासाठीच आपले उमेदवार उभे करत आहे," असा दावा जयराम रमेश यांनी केला.

"एमआयएम म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून भाजपची बी-टीम”

जयराम रमेश यांनी असदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (AIMIM)बाबतही रोखठोक भूमिका मांडली. ओवेसींचा पक्ष भाजपसाठी काम करतो. एमआयएम म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून भाजपची बी-टीम आहे. भाजपाकडून त्यांना सर्व प्रकारची मदत मिळते आणि त्यावर त्यांची संघटना मजबूत केली जाते, असा आरोप त्यांनी केला. भारत जोडो यात्रेत काँग्रेस पक्षाला ज्या प्रकारे जनसमर्थन मिळत आहे, त्यावरून जनतेची काँग्रेस पक्षाप्रती असलेली ओढ सातत्याने वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर राज्यस्तरीय वैयक्तिक दौरे काढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. आसाम आणि ओडिशा पासून सुरुवात करून त्यानंतर ते पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्येही अशा रॅली काढल्या जाणार आहेत. त्यातून विरोधकांसंबंधी माहिती देऊन जनजागृती केली जाईल," असा इशाराच त्यांनी दिला. 

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण