शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

'WHO चा ‘डेटा’ आणि काँग्रेसचा ‘बेटा’ दोन्हीही चूक', कोरोना मृतांच्या अहवालावरून भाजपचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 18:42 IST

WHO ने गुरुवारी जारी केलेल्या अहवालात, कोरोना व्हायरसमुळे भारतात 47 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. हा आकडा भारताच्या अधिकृत आकडेवारीच्या तुलनेत 10 पट अधिक आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी हे कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूंवर राजकारण करत आहेत, असा  आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. यासंदर्भात बोलताना, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जाहीर केलेला ‘डेटा’ आणि काँग्रेसचा ‘बेटा’ दोन्ही चुकीचे असल्याचे भाजपने म्हटले आहे. 

यासंदर्भात, पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंसंदर्भात डब्ल्यूएचओने जाहीर केलेली आकडेवारी चुकीची आहे. भारत सरकारने याबाबत डब्ल्यूएचओकडे आक्षेपही नोंदवला आहे. एवढेच नाही, तर डब्ल्यूएचओने जारी केलेल्या आकडेवारीवरून संपूर्ण जगात भारतासंदर्भात भ्रामक स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असेही ते म्हणाले.

भाजपचा राहुल गांधींवर निशाणा -पात्रा म्हणाले, राहुल गांधी सातत्याने भारताचा कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका करत वारंवार भारताचा कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. मृत्यू आणि जन्मासंदर्भातील आंकडेवारीची नोंद ठेवण्यासाठी भारताकडे एक चांगल्या प्रकारची प्रणाली आहे.

WHO ने गुरुवारी जारी केलेल्या अहवालात, कोरोना व्हायरसमुळे भारतात 47 लाख लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. हा आकडा भारताच्या अधिकृत आकडेवारीच्या तुलनेत 10 पट अधिक आहे. भारत सरकारने WHO च्या या आकडेवारीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत. पात्रा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने ज्या प्रकारे कोरोनाचा सामना केला, ते अद्भुत आणि अद्वितीय होते. एवढेच नाही, तर ते संपूर्ण जगासाठी एक उदाहरण होते, असे संपूर्ण जग मानते. असे असताना मृत्यूच्या आकड्यांवर राजकारण करणे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSambit Patraसंबित पात्राBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना