शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

"पंतप्रधान मोदींशी पंगा घेतला तर राजकीय जीवन संपुष्टात येईल"; भाजपा नेत्याचा मुख्यमंत्र्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 08:31 IST

BJP Arvind Dharmapuri And K Chandrashekhar Rao : भाजपा खासदार अरविंद धर्मपुरी यांनी केसीआर यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

नवी दिल्ली - तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांनी मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून निशाणा साधला आहे. यानंतर भाजपा खासदार अरविंद धर्मपुरी (BJP Arvind Dharmapuri) यांनी केसीआर यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. निजामाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार धर्मपुरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केसीआर यांनी पंगा घेतला तर त्यांचे राजकीय जीवन संपुष्टात येईल असं म्हटलं आहे. तसेच केसीआर यांच्या राजकीय मृत्यूची वेळ आली आहे असं वादग्रस्त विधान देखील केलं आहे. ते जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. 

अरविंद धर्मपुरी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना "जेव्हा गिधाडाचा मृत्यू जवळ येतो तेव्हा तो शहराकडे धावतो. तसेच आता केसीआर यांच्या राजकीय मृत्यूची वेळ आली आहे, म्हणून ते मोदींशी पंगा घेत आहेत आणि केंद्र सरकारशी खोटे बोलत आहेत" असं म्हटलं आहे. तसेच शेतकऱ्यांचा संदर्भ देत धर्मपुरी म्हणाले की "काय पेरणी करावी आणि काय करू नये, हे ना आम्ही कधी शेतकऱ्यांना सुचवले आहे, ना आम्ही शेतकऱ्यांकडून पीक खरेदी करणार नाही, असे कधी सांगितले नाही. केसीआर जनतेची दिशाभूल करत आहेत." यासोबतच पुरस्कारासाठी राज्यातील लोकांची मुख्यमंत्र्यांनी शिफारस का केली नाही" असा सवाल धर्मपुरी यांनी केला आहे. 

मोदी सरकारवर तेलंगणातील लोकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी सोमवारी मोदी सरकारवर तेलंगणातील लोकांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. मोदी सरकार आपल्या राज्यातील जनतेला जाणीवपूर्वक पुरस्कार देत नाही असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. "जीभ कापून टाकू" असं म्हणत थेट भाजपा नेत्यांना इशारा दिला आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच राज्यातील शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करण्याचे आश्वासन फसवे असल्याचं म्हटलं. याच दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भाजपा नेत्यांना आमच्याबद्दल अनावश्यक गोष्टी बोलणं टाळा नाहीतर जीभ कापून टाकू असा इशाराही दिला. केसीआर यांनी केंद्र सरकारने हे स्पष्ट केले आहे की ते धान्य खरेदी करणार नाही आणि कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दुसरे पीक निवडण्यास सांगितले आहे असं म्हटलं आहे.

"...तर जीभ कापून टाकू"; तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा भाजपा नेत्यांना इशारा

"तुम्ही आमच्याबद्दल उद्धटपणे बोललात तर आम्ही तुमच्या (राज्यातील भाजपा नेत्यांच्या) जीभ कापून टाकू" असं म्हटलं आहे. "संजय म्हणाले होते की ते मला तुरुंगात पाठवणार आहेत. मी त्यांना मला स्पर्श करण्याचे आव्हान देतो. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून भाजपावर टीका करताना केसीआर म्हणाले की, आम्ही केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांसोबत आहोत. "शेती कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही पाठिंबा देऊ. शेतकऱ्यांना वाचवण्याची जबाबदारी आपली आहे. विरोधक राजकारण करुन शेतकर्‍यांच्या भावनांशी खेळत आहेत. तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) शेतकर्‍यांच्या हक्कासाठी केंद्राविरोधात आंदोलन करणार आहे" असंही के चंद्रशेखर राव यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाTelanganaतेलंगणाPoliticsराजकारण