शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

रोहिंग्यांना पाठिंबा दिल्याने भाजपाने केली अल्पसंख्यांक महिला नेत्याची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 15:28 IST

बेनजीर आरफान यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रोहिंग्यांना म्यानमार सरकारकडून मिळणा-या वागणुकीचा निषेध करण्यासाठी एकत्र येऊन निषेध करत उपोषण करण्याचं आवाहन केलं होतं

ठळक मुद्देरोहिंग्या निर्वासितांना पाठिंबा दर्शवल्यामुळे भाजपाच्या आसाम युनिटने कार्यकारी समितीमधील अल्पसंख्यांक महिला नेत्याची हकालपट्टी केलीबेनजीर आरफान यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रोहिंग्यांना पाठिंबा दर्शवला होताकोणतीही कारणे दाखवा नोटीस न देता माझ्यावर कारवाई केली आहे असा दावा बेनजीर आरफान यांनी केला आहे

गुवाहाटी, दि. 18 - म्यानमारमधील रोहिंग्या निर्वासितांना पाठिंबा दर्शवल्यामुळे भाजपाच्या आसाम युनिटने कार्यकारी समितीमधील अल्पसंख्यांक महिला नेत्याची हकालपट्टी केली आहे. बेनजीर आरफान यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून रोहिंग्यांना म्यानमार सरकारकडून मिळणा-या वागणुकीचा निषेध करण्यासाठी एकत्र येऊन निषेध करत उपोषण करण्याचं आवाहन केलं होतं. महत्वाचं म्हणजे आसाम राज्यात ट्रिपल तलाकविरोधात प्रचार करण्यासाठी बेनजीर आरफान भाजपाचा मुख्य चेहरा होत्या. त्या स्वत: ट्रिपल तलाक पीडित आहेत. 

गुरुवारी आसाममधील भाजपाचे महासचिव दिलीप सैकिया यांनी बेनजीर आरफान यांना पत्र पाठवून तुमच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करत असल्याची माहिती दिली. तसंच तुमच्याविरोधात कारवाई का करण्यात येऊ नये याचं स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. 

'एक व्यक्ती म्हणून मी अशा हल्ल्यांचं समर्थन करु शकत नाही, आणि मी ही गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली. मात्र आमच्या प्रदेशाध्यक्ष रणजीत दास यांनी गुन्हा केल्याप्रमाणे वागणूक दिली. पक्षाने माझी बाजू जाणून न घेता, कोणतीही कारणे दाखवा नोटीस न देता माझ्यावर कारवाई केली आहे', असा दावा बेनजीर आरफान यांनी केला आहे. बेनजीर आरफान यांनी पत्राद्वारे माफी मागितली आहे. 

दरम्यान केंद्र सरकारने रोहिंग्या मुस्लिमांसंबंधी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. काही रोहिंग्या मुस्लिमांचा पाकिस्तानमधील आयएसआय आणि दहशतवादी संघटनांशी संबंध असून, त्यांच्यापासून देशाच्या सुक्षेला धोका आहे असं गुप्तचर यंत्रणांकडून कळलं आहे अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे की, 'रोहिंग्या मुस्लिम देशाच्या सुरक्षेसाठी धोका आहेत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत भारतात राहण्याची परवानगी दिली जाऊ नये'. सर्वोच्च न्यायलयाने 3 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. 

म्यानमारमध्ये दहा लाखांपेक्षा जास्त रोहिंग्या मुस्लिम होते. अनेक दशकांपासून स्थानिकांशी त्यांचा संघर्ष सुरू असून या संघर्षामुळे बहुसंख्य रोहिंग्यांनी म्यानमारमधून स्थलांतर केले आहे, २०१२ मध्ये म्यानमारमधील रोहिंग्यांचे लोंढे भारतात पोहोचले. भारतात जम्मू, हरयाणातील मेवत जिल्ह्यातील नूह, हैदराबाद, दिल्ली, जयपूर व चेन्नई येथे रोहिंग्यांचे वास्तव्य आहे. भारतात सुमारे ४० हजार रोहिंग्या असून या रोहिंग्या निर्वासितांना परत पाठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात दोन जणांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. रोहिंग्या मुस्लिमांना परत पाठवण्याच्या भारताच्या निर्णयावर संयुक्त राष्ट्रानेही नाराजी व्यक्त केली होती. 

टॅग्स :BJPभाजपा