शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 11:57 IST

'चिदंबरम सतत पाकिस्तानचा बचाव का करत आहेत? काँग्रेस नेहमीच आपल्याच सुरक्षा संस्थांवर प्रश्न का उपस्थित करते? '

Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केलेल्या विधानावर भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या शोभा करंदलाजे यांनी चिदंबरम यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, चिदंबरम सतत पाकिस्तानचा बचाव का करत आहेत? काँग्रेस नेहमीच स्वतःच्या सुरक्षा संस्थांवर प्रश्न का उपस्थित करते? त्यांच्याकडून जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी निर्यात करणाऱ्या देशावर कधीच प्रश्न का उपस्थित केले जात नाहीत?

शोभा करंदलाजे पुढे म्हणाल्या की, पाकिस्तानचा भारतात दहशतवाद्यांना घुसवण्याचा दीर्घ आणि रक्तरंजित इतिहास आहे. हे पहिल्यांदाच घडलेले नाही. तरीही काँग्रेसने अशा घृणास्पद कृत्यांना वारंवार कमी लेखले आहे. चिदंबरम त्यांच्या विधानातून कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत? तुम्हाला भारताच्या शूर सैन्यापेक्षा आयएसआयवर जास्त विश्वास आहे का? राष्ट्रीय हितापेक्षा राजकीय द्वेष महत्त्वाचा आहे का?  असे दिसते की, काँग्रेसच्या डीएनएमध्ये काही गंभीर दोष आहेत. त्यामुळेच ते नेहमी भारतावर संशय घेतात, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

चिदंबरम काय म्हणाले?चिदंबरम यांनी अलिकडेच म्हटले होते की, गेल्या काही आठवड्यात एनआयएने काय केले आहे, हे सरकार सांगण्यास तयार नाही. त्यांनी दहशतवाद्यांची ओळख पटवली आहे का? ते कुठून आले? ते देशातच तयार झालेले दहशतवादी आहेत का? पाकिस्तानातून आले आहेत असे तुम्ही का गृहीत धरले? याचा कोणताही पुरावा नाही. भारताचे झालेले नुकसानही सरकार लपवत आहे, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

माजी गृहमंत्री चिदंबरम यांनी आरोप केला की, सरकारने देशाला विश्वासात घेतले नाही. पंतप्रधानांनी सांगितले की, ही कारवाई थांबवण्यात आली आहे, संपलेली नाही. जर असे असेल तर त्यानंतर सरकारने कोणती पावले उचलली आहेत? पहलगामसारखा दुसरा हल्ला रोखण्यासाठी मोदी सरकारने काही ठोस पावले उचलली आहेत का? पंतप्रधान मोदी याबद्दल का बोलत नाहीत? असेही त्यांनी म्हटले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरBJPभाजपाcongressकाँग्रेसP. Chidambaramपी. चिदंबरम