शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

Delhi Election Result: 2 वर्षांत एनडीएनं 6 राज्यांत गमावली सत्ता, दिल्लीच्या निकालानं वाढवलं भाजपाचं टेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 09:49 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला असून, आम आदमी पार्टीकडे जनतेनं तिसऱ्यांदा सत्ता सोपवलेली आहे.

ठळक मुद्देदिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला असून, आम आदमी पार्टीकडे जनतेनं तिसऱ्यांदा सत्ता सोपवलेली आहे. देशाच्या राजधानीच्या विधानसभेची किल्ली भाजपाला कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या हातात ठेवायची होती. परंतु त्यात त्यांना यश आलेलं नाही. 70 जागांच्या या दिल्ली विधानसभेत भाजपाला 10चा आकडाही गाठता आलेला नाही.

नवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागलेला असून, आम आदमी पार्टीकडे जनतेनं तिसऱ्यांदा सत्ता सोपवलेली आहे. पण या निकालानं भाजपाचं टेन्शन वाढवलं आहे. देशाच्या राजधानीच्या विधानसभेची किल्ली भाजपाला कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या हातात ठेवायची होती. परंतु त्यात त्यांना यश आलेलं नाही. विशेष म्हणजे 70 जागांच्या या दिल्ली विधानसभेत भाजपाला 10चा आकडाही गाठता आलेला नाही. भाजपा 3हून वाढून 8 जागांवर पोहोचली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला फक्त हरणायाची सत्ता काबिज करता आलेली आहे. उर्वरित राज्यांतील सत्ता त्यांच्या हातून निसटली आहे. गेल्या दोन वर्षांच्या भाजपा आणि एनडीएच्या कामगिरीवर नजर टाकल्यास त्यांच्या हातून सहा राज्यांतील सत्ता गेली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी चार राज्यांच्या निवडणुका झाल्या होत्या. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मिझोराम या चारही राज्यांत भाजपाला सत्ता मिळवता आलेली नाही. लोकसभा निवडणुकीदरम्यान आणखी एक राज्य भाजपा आणि एनडीएपासून दुरावलं. आंध्र प्रदेशमध्ये भाजपा तेलगु देसमबरोबर सत्तेत होती. परंतु निवडणुकीपूर्वीच टीडीपीनं भाजपाची साथ सोडली. विधानसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशच्या सत्तेतून भाजपाबरोबर टीडीपीसुद्धा बाहेर गेली. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकांत महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये भाजपाला हरियाणात सत्ता मिळाली, पण झारखंड राज्य त्यांनी गमावलं. महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपाला विरोधी पक्षात बसावं लागलं.अशा प्रकारे एकापाठोपाठ एका राज्यातून भाजपाला सत्ता गमवावी लागली आहे. दिल्लीत भाजपाचा लाजिरवाणा पराभवदिल्लीत भाजपाला पुन्हा एकदा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत झालेल्या पराभवामुळे भाजपाची चिंता वाढलेली आहे. भाजपाला दिल्लीतली सत्ता हवी होती, त्यासाठी त्यांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. परंतु आम आदमी पार्टीनं पुन्हा एकदा 62 जागांवर विजय मिळवत सत्ता हस्तगत केली. दोन वर्षांपूर्वीचा विचार केल्यास डिसेंबर 2017मध्ये भाजपा आणि त्यांचे मित्र पक्षांची 19 राज्यांमध्ये सत्ता होती.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाAmit Shahअमित शहा