शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हरियाणात भाजप-जेजेपी विभक्त; सैनी मुख्यमंत्री, मनोहर लाल खट्टर यांना पदावरुन का हटवले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 06:04 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरयाणा दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना हटवून कुरुक्षेत्रचे खासदार नायबसिंह सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली.

बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क, चंडीगड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरयाणा दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना हटवून कुरुक्षेत्रचे खासदार नायबसिंह सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली. भाजपच्या लोकसभा निवडणूक तयारीचा भाग म्हणून या घडामोडीकडे पाहिले जात आहे. यानंतर राज्यातील साडेचार वर्षे जुनी भाजप-जेजेपी युती तुटली.

भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सैनी यांची एकमताने नेतेपदी निवड केल्यावर राजभवनात राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तत्पूर्वी मनोहर लाल खट्टर यांनी राजभवनात जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सैनी यांनी मंत्रिमंडळात पाच मंत्र्यांचा समावेश केला. मुख्यमंत्री सैनी यांनी ४८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना दिले. तसेच उद्याच बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली. 

जेजेपी सत्तेबाहेर 

- खट्टर यांच्या सरकारचा भाग असलेला जननायक जनता पक्ष (जेजेपी) वेगळा झाल्यानंतर जेजेपीचे नेते तथा उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्यासह तिन्ही मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडले आहेत. 

- जेजेपीने युतीसाठी भाजपकडे दोन जागांची मागणी केली होती; पण भाजपने एकच जागा देऊ केली होती. त्यामुळे साडेचार वर्षे जुनी युती तुटली. 

खट्टर यांना पदावरुन का हटवले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरयाणा दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी खट्टर यांचा राजीनामा घेतल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्री बदलल्याशिवाय राज्यातील लोकसभेच्या जागा जिंकणे कठीण असल्याचा अहवाल नेतृत्वाला देण्यात आला. त्यामुळेच त्यांना हटवल्याचे जाणकारांचे मत आहे. सैनी यांना मुख्यमंत्री करून भाजपने मागासवर्गीयांची मने जिंकण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. 

आता देशभरात आली बदलाची वेळ : काँग्रेस

हरयाणातील वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशभरात परिवर्तनाची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसतर्फे व्यक्त करण्यात आली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, हरयाणातील अराजकता ही शेतकरी, तरुण आणि कुस्तीपटूंच्या मुद्द्यांवरून वाढत चाललेल्या संतापाचे प्रतिबिंब आहे. बदलाची वेळ आली आहे. 

टॅग्स :HaryanaहरयाणाBJPभाजपा