शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणात भाजप-जेजेपी विभक्त; सैनी मुख्यमंत्री, मनोहर लाल खट्टर यांना पदावरुन का हटवले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 06:04 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरयाणा दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना हटवून कुरुक्षेत्रचे खासदार नायबसिंह सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली.

बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क, चंडीगड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरयाणा दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना हटवून कुरुक्षेत्रचे खासदार नायबसिंह सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली. भाजपच्या लोकसभा निवडणूक तयारीचा भाग म्हणून या घडामोडीकडे पाहिले जात आहे. यानंतर राज्यातील साडेचार वर्षे जुनी भाजप-जेजेपी युती तुटली.

भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सैनी यांची एकमताने नेतेपदी निवड केल्यावर राजभवनात राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तत्पूर्वी मनोहर लाल खट्टर यांनी राजभवनात जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सैनी यांनी मंत्रिमंडळात पाच मंत्र्यांचा समावेश केला. मुख्यमंत्री सैनी यांनी ४८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना दिले. तसेच उद्याच बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली. 

जेजेपी सत्तेबाहेर 

- खट्टर यांच्या सरकारचा भाग असलेला जननायक जनता पक्ष (जेजेपी) वेगळा झाल्यानंतर जेजेपीचे नेते तथा उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्यासह तिन्ही मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडले आहेत. 

- जेजेपीने युतीसाठी भाजपकडे दोन जागांची मागणी केली होती; पण भाजपने एकच जागा देऊ केली होती. त्यामुळे साडेचार वर्षे जुनी युती तुटली. 

खट्टर यांना पदावरुन का हटवले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरयाणा दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी खट्टर यांचा राजीनामा घेतल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्री बदलल्याशिवाय राज्यातील लोकसभेच्या जागा जिंकणे कठीण असल्याचा अहवाल नेतृत्वाला देण्यात आला. त्यामुळेच त्यांना हटवल्याचे जाणकारांचे मत आहे. सैनी यांना मुख्यमंत्री करून भाजपने मागासवर्गीयांची मने जिंकण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. 

आता देशभरात आली बदलाची वेळ : काँग्रेस

हरयाणातील वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशभरात परिवर्तनाची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसतर्फे व्यक्त करण्यात आली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, हरयाणातील अराजकता ही शेतकरी, तरुण आणि कुस्तीपटूंच्या मुद्द्यांवरून वाढत चाललेल्या संतापाचे प्रतिबिंब आहे. बदलाची वेळ आली आहे. 

टॅग्स :HaryanaहरयाणाBJPभाजपा