शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

हरियाणात भाजप-जेजेपी विभक्त; सैनी मुख्यमंत्री, मनोहर लाल खट्टर यांना पदावरुन का हटवले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 06:04 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरयाणा दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना हटवून कुरुक्षेत्रचे खासदार नायबसिंह सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली.

बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क, चंडीगड: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरयाणा दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना हटवून कुरुक्षेत्रचे खासदार नायबसिंह सैनी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात आली. भाजपच्या लोकसभा निवडणूक तयारीचा भाग म्हणून या घडामोडीकडे पाहिले जात आहे. यानंतर राज्यातील साडेचार वर्षे जुनी भाजप-जेजेपी युती तुटली.

भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सैनी यांची एकमताने नेतेपदी निवड केल्यावर राजभवनात राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तत्पूर्वी मनोहर लाल खट्टर यांनी राजभवनात जाऊन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. सैनी यांनी मंत्रिमंडळात पाच मंत्र्यांचा समावेश केला. मुख्यमंत्री सैनी यांनी ४८ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना दिले. तसेच उद्याच बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली. 

जेजेपी सत्तेबाहेर 

- खट्टर यांच्या सरकारचा भाग असलेला जननायक जनता पक्ष (जेजेपी) वेगळा झाल्यानंतर जेजेपीचे नेते तथा उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्यासह तिन्ही मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडले आहेत. 

- जेजेपीने युतीसाठी भाजपकडे दोन जागांची मागणी केली होती; पण भाजपने एकच जागा देऊ केली होती. त्यामुळे साडेचार वर्षे जुनी युती तुटली. 

खट्टर यांना पदावरुन का हटवले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरयाणा दौऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी खट्टर यांचा राजीनामा घेतल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुख्यमंत्री बदलल्याशिवाय राज्यातील लोकसभेच्या जागा जिंकणे कठीण असल्याचा अहवाल नेतृत्वाला देण्यात आला. त्यामुळेच त्यांना हटवल्याचे जाणकारांचे मत आहे. सैनी यांना मुख्यमंत्री करून भाजपने मागासवर्गीयांची मने जिंकण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. 

आता देशभरात आली बदलाची वेळ : काँग्रेस

हरयाणातील वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशभरात परिवर्तनाची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसतर्फे व्यक्त करण्यात आली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, हरयाणातील अराजकता ही शेतकरी, तरुण आणि कुस्तीपटूंच्या मुद्द्यांवरून वाढत चाललेल्या संतापाचे प्रतिबिंब आहे. बदलाची वेळ आली आहे. 

टॅग्स :HaryanaहरयाणाBJPभाजपा