शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपचे सहयोगी बुडते जहाज सोडत आहेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 06:26 IST

झामुमोच्या नेतृत्वातील विरोधी आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हेमंत सोरेन यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली : झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला आघाडी करण्यासाठी अडचणी येत असताना झामुमोच्या नेतृत्वातील विरोधी आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार हेमंत सोरेन यांनी म्हटले आहे की, भाजपचे सहयोगी बुडते जहाज सोडत आहेत. वारा कोणत्या दिशेने वाहत आहे, हे त्यांना ठाऊक आहे. ही लोकसभेची निवडणूक नाही. ही राज्यातील निवडणूक आहे. केंद्र स्तरावरील मुद्दे लोकसभेच्या निवडणुकीत महत्त्वाचे असतात. आता राज्यातील निवडणूक राज्यातील मुद्यांवर लढवली जाईल.झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर असा आरोप केला की, आपल्या गैरकारभारावरून लक्ष हटविण्यासाठी भाजप राष्ट्रवादासारखे मुद्दे उपस्थित करीत आहे. भूसंपादन आणि बेरोजगारी यासारख्या राज्याच्या मुद्यांवर निवडणूक लढविली जाईल, असा दावाही ते एकीकडे करीत आहेत. सोरेन म्हणाले की, छोटा नागपूर टेनेन्सी आणि संथाल परगना टेनेन्सी अ‍ॅक्टचे मुद्दे आपण जम्मू- काश्मीर आणि गुजरातमध्ये उपस्थित करू शकत नाहीत. वन अधिकारांबाबत आम्ही बाहेरच्या ठिकाणी बोलू शकत नाही. राज्याचे मुद्दे राज्याच्या निवडणुकीत नाहीत, तर मग कुठे उपस्थित करायचे? जर प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादाचीच चर्चा करायची, तर मग राज्याचे प्रश्न कुठे उपस्थित करायचे? असे सवालही सोरेन यांनी केले.विरोधी पक्षांच्या आघाडीचे सोरेन हे नेतृत्व करीत आहेत. यात झामुमो, काँग्रेस आणि राजद यांचा समावेश आहे. झामुमो ४३, काँग्रेस ३१, तर राजद ७ जागा लढवीत आहे. अयोध्याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निकालावर परिणाम होऊ शकतो काय? असा सवाल केला असता ते म्हणाले की, हे प्रकरण जुने आहे आणि समाप्त झाले आहे. राज्याच्या निवडणुकीशी याचा संबंध नाही. न्यायालयाने निकाल दिला आहे आणि याचा राजकीय मुद्दा बनविणे योग्य नाही.सोरेन म्हणाले की, राज्यातील रघुबर दास सरकारकडून लोकांची आता फसवणूक केली जाऊ शकत नाही आणि लोक आता बदल करण्यासाठी मतदान करणार आहेत. भाजप आणि मित्रपक्षांबाबत बोलताना ते म्हणाले की, आॅल झारखंड स्टुडंट युनियन भाजपसोबत सत्तेत होता; पण त्यांनी आता भाजपविरुद्ध उमेदवार दिले आहेत. जेडीयू स्वतंत्रपणे लढत आहे. एजेएस यू भाजपची बी टीम आहे.एनडीएची घटक पक्ष असलेली एजेएसयू पार्टी १५ ठिकाणी समोरासमोर लढत आहे. लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी गत आठवड्यातच स्पष्ट केले की, आमचा पक्ष ५० जागा स्वबळावर लढणार आहे.बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या वाढल्यासोरेन यांनी असा आरोप केला की, भाजपकडे कोणताही मुद्दा नाही. त्यांच्या पाच वर्षांच्या काळात राज्यात विनाश झाला आहे. लोकांना ते उत्तर देऊ शकत नाहीत. त्यामुळे ते भावनिक मुद्दे उपस्थित करीत आहेत. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. महागाई वाढली आहे. शेतकरी आत्महत्या करीत आहेत.सोरेन म्हणाले की, बंदुकीच्या आणि बळाच्या जोरावर भूसंपादन केले जात आहे. अनेक शेतकऱ्यांचा बळी जात आहे. आम्ही हा प्रकार समाप्त करू. आम्ही रोजगार देण्याचा शब्द दिला आहे. आम्ही पाच लाख नवे रोजगार निर्माण करू आणि खासगी नोकरीत झारखंडच्या युवकांना ७५ टक्के नोकºया देऊ. सरकारी नोकºयात महिलांना ५० टक्के आरक्षण देऊ.

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदी