शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

निर्भिड पत्रकारिता करण्यासाठी त्यांनी राजकारणातून घेतली निवृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 16:42 IST

ओदिशामधील एका खासदारांनी चक्क पत्रकारितेमध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी राजकारणाला रामराम ठोकल्याचे दुर्मीळ चित्र समोर आले आहे.

ठळक मुद्देतथागत सत्पथी असे पत्रकारितेसाठी राजकारण सोडणाऱ्या खासदारांचे नाव बिजू जनता दल पक्षाचे नेते असलेले सत्पथी हे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेततथागत सत्पती यांच्या कुटुंबाला राजकारणाचा प्रदीर्घ वासरा असून, त्यांच्या मातोश्री नंदिनी सत्पथी या प्रख्यात लेखिका आणि ओदिशाच्या माजी मुख्यमंत्री होत्या

नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांमध्ये राजकारण हे जनसेवेपेक्षा सत्ता, प्रसिद्धी आणि संपत्ती मिळण्याचे साधन बनले आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात कार्यरत असलेली मंडळी राजकारणात प्रवेश करण्याची संधी शोधत असतात. मात्र ओदिशामधील एका खासदारांनी चक्क पत्रकारितेमध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी राजकारणाला रामराम ठोकल्याचे दुर्मीळ चित्र समोर आले आहे. तथागत सत्पथी असे पत्रकारितेसाठी राजकारण सोडणाऱ्या खासदारांचे नाव असून, बिजू जनता दल पक्षाचे नेते असलेले सत्पथी हे चार वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.  राजकारणात स्थिरस्थावर झाल्यानंतर अनेकजण अखेरच्या श्वासापर्यंत पदाला चिकटून राहतात. मात्र प्रदीर्घ राजकीय वारसा लाभलेला असूनही सत्पथी यांनी राजकारण सोडून आपला मूळ पेशा असलेल्या पत्रकारितेकडे वळण्याचा निर्णय घेतला. तथागत सत्पती यांच्या कुटुंबाला राजकारणाचा प्रदीर्घ वासरा असून, त्यांच्या मातोश्री नंदिनी सत्पथी या प्रख्यात लेखिका आणि ओदिशाच्या माजी मुख्यमंत्री होत्या. नंदिनी सत्पथी यांनी 14 जून 1972 ते 16 डिसेंबर 1976 या काळात ओदिशाचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते. 

 तथागत सत्पथी हे ओदिशामधील ढेंकनाल लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.  दरम्यान, पत्रकारितेमध्ये पुन्हा येण्यासाठी त्यांनी वयाच्या 62 व्या वर्षी राजकारणातून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.  या निर्णयाबाबत ते म्हणाले की, ''सध्या पत्रकारितेला निडर आणि निर्भिड आवाजांची गरज आहे. त्यामुळे पत्रकारितेवर पुन्हा एकदा लक्ष्य केंद्रित करण्यासाठी मी राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या दीर्घ राजकीय प्रवासादरम्यान केलेल्या सहकार्याबद्दल मी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा आभारी आहे. मात्र आता जनसेवेसाठी राजकारण हे माध्यम नाही याची जाणीव मला झाली आहे.'' 

 दरम्यान, आपल्याला मतदान करणाऱ्या मतदारांचेही सत्पथी यांनी आभार मानले आहेत. ज्या मतदारांनी आम्हाला नेहमीच पाठिंबा आणि प्रेम दिले त्यांचे मी आभार मानतो. देशामध्ये सामाजिक नेतृत्वाचा अभाव आहे तसेच युवा नेतृत्वाला पुढे आणण्याचीही हीच योग्य वेळ आहे.'' असेही सत्पती म्हणाले. 

 

टॅग्स :PoliticsराजकारणBiju Janata Dalबिजू जनता दलOdishaओदिशाIndiaभारत