शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 13:15 IST

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान तुर्कस्तानने पाकची बाजू घेत आपलं मत मांडलं होतं. मात्र, यानंतर भरतात 'बॉयकॉट तुर्की'चा ट्रेंड सुरू झाला आहे. याचा फटका आता तुर्कीला बसू शकतो.

भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान, तुर्की पाकिस्तानच्या समर्थनार्थ सर्वात आधी पुढे आला होता. तेव्हापासून, भारतात तुर्कस्तानवर बंदी घालण्याचा ट्रेंड इंटरनेटवर जोर धरत आहे. पण, आता यामुळे तुर्कस्तानला मोठा फटका बसू शकतो. कारण, पाकिस्तानला पाठिंबा देणारे तुर्की लोक भारतातील भात आणि मसाले खातात. दोन्ही देशांमधील व्यापार गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. तांदूळ आणि मसाल्यांचा हा व्यापार तब्बल १० अब्ज डॉलर्सपेक्षा मोठा आहे. पण, आता पाकिस्तानला पाठिंबा देणे तुर्कीला महागात पडू शकते.  

२०२३-२४ मध्ये भारताने तुर्कीला ६.६५ अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात केली होती. भारतातून तुर्कीमध्ये बऱ्याच गोष्टी निर्यात केल्या जातात. या यादीत तांदूळ, मसाले, कापड, चहा आणि कॉफी यांचा समावेश आहे. बासमती तांदळासाठी तुर्की पूर्णपणे भारतावर अवलंबून आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात बासमती तांदूळ तुर्कीमध्ये जातो. तुर्कीतील लोकांना भारतीय बासमती तांदळापासून बनवलेली बिर्याणी खायला आवडते. इतकंच नाही तर, बिर्याणी बनवण्यासाठी वापरले जाणारे मसाले देखील भारतातूनच तुर्कीला जातात. भारत हा बासमती तांदळाचा जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे आणि तुर्की देखील त्याचा मोठा खरेदीदार आहे.

मसाले आणि चहाचीही मोठी निर्यात

भारत तुर्कीला हळद, जिरे, धणे आणि लाल मिरची देखील पाठवतो. भारतीय मसाले त्यांच्या ताजेपणा आणि सुगंधासाठी जगभरात लोकप्रिय आहेत. भारतातून तुर्कस्तानात कापूस, रेशीम आणि तयार कपडे देखील निर्यात केले जातात. तिथे भारतीय साड्या, कुर्ता, बेडशीट, पडदे खूप लोकप्रिय आहेत. जर, तुर्कीसोबतचे संबंध बिघडले तर त्याचा कापड, तांदूळ आणि मसाल्यांच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. दार्जिलिंगचा चहा आणि कॉफी भारतातून तुर्कीला पाठवला जातो.

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPakistanपाकिस्तान