शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

‘बिपोरजॉय’चा तडाखा सुरूच, राजस्थानमध्ये रुग्णालयांत घुसले पाणी; चार जिल्ह्यांना पुराचा वेढा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 06:44 IST

अडकलेल्या ३० जणांची सुटका करण्यात यश आले आहे.

जयपूर : बिपोरजॉय वादळामुळे राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. जयपूर हवामान केंद्राने सोमवारी सवाई माधोपूर, बुंदी जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्याचवेळी कोटा, करौली, बारन, भिलवाडा आणि टोंकसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. एकूण ४ जिल्ह्यांना पुराने वेढा घातला आहे. अडकलेल्या ३० जणांची सुटका करण्यात यश आले आहे.

पावसामुळे अजमेरमधील सरकारी रुग्णालय जलमय झाले. १८ रुग्णांना दुसऱ्या वॉर्डात हलवावे लागले. गेल्या २४ तासांत राज्यात अनेक ठिकाणी ३०० मिमी म्हणजेच १२ इंच पावसाची नोंद झाली. पाली, जालोर, बारमेर आणि सिरोहीमध्ये पूरस्थिती आहे. राज्यात पूर आणि पावसामुळे आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

हवामान विभागानुसार, १९ आणि २० जून रोजी ‘बिपोरजॉय’चा प्रभाव भरतपूर, कोटा विभागात असेल. चक्रीवादळ कमकुवत होत कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होईल. त्यामुळे बुधवारपर्यंत त्याचा प्रभाव कमी होईल, असे मानले जात आहे.  चक्रीवादळ सध्या ताशी १० किमी वेगाने उत्तर-पूर्व दिशेकडे सरकत आहे.

आसाममधील पूरस्थिती; ३३४०० लोकांना फटकापूरस्थितीला सामोरे जात असलेल्या आसामच्या अनेक भागांत रविवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्यामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. शेतजमिनीसह खेडी व शहरे जलमय झाली आहेत. आसाममधील पूरस्थितीचा ३३४०० लोकांना फटका बसला आहे. चिंतेत भर घालणारी बाब म्हणजे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) आसामसाठी अतिसतर्कतेचा इशारा जारी केला असून, गुरुवारपर्यंत राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

हजारो लाेकांना हलवलेचक्रीवादळामुळे जालोरमध्ये सर्वाधिक १८ इंच पाऊस झाला. तसेच अहोर येथे ४७१ मिमी, भीनमाळ २१७, राणीवाडा ३२२, चितळवण ३३८, सांचोरे २९६, जसवंतपुरा ३३२, बगोडा ३१० आणि सायला येथे ४११ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जालोर येथील परिस्थिती अनियंत्रित झाली. एनडीआरएफ-एसडीआरएफच्या मदतीने हजारो लोकांना सुरक्षितस्थळी नेण्यात आले.

हरयाणात चक्रीवादळाचा प्रवेशचंडीगड : राजस्थान, गुजरातनंतर बिपोरजॉय हरयाणात दाखल झाले आहे. चक्रीवादळामुळे रविवारी रात्री उशिरा वातावरणात बदल झाला. त्यानंतर ताशी ६० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहू लागले, परंतु कोणतेही नुकसान झाले नाही. 

हिमाचलवर वादळाचा प्रभाव शिमला : बिपोरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव हिमाचल प्रदेशात दिसू लागला आहे. सिमला हवामान केंद्राने सोलन, शिमला, सिरमौर, मंडी आणि बिलासपूर या पाच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. गेल्या २४ तासांत पालमपूरमध्ये सर्वाधिक ५७ मिमी आणि धरमशाला ४४ मिमी पाऊस झाला.

    गुजरातमध्ये... २४ तासांपासून उत्तर मुसळधार पाउस सुरू २० गाई पाण्यात वाहून गेल्याने मृत्युमुखी पडल्या २४ तासांत १२६ मिमी पाउस  बनासकांठामध्ये झाला.

    राजस्थानमध्ये...रुग्णालयांमध्ये पाणी शिरलेपावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला३० लोकांना सुरक्षित बाहेर काढले

टॅग्स :cycloneचक्रीवादळ