शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

JDU पुन्हा BJP सोबत जाणार? नितीश कुमार यांच्या पुढच्या भूमिकेवर लालू यादव स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 21:27 IST

...यानंतर, जेडीयू पुन्हा एकदा भाजपसोबत हातमिळवणी करू शकते, अशी चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू झाली आहे.

राज्यसभेचे उपसभापती आणि जेडीयूचे खासदार हरिवंश नारायण सिंह पाटण्यात आले आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेऊन दिल्लीला निघून गेले. यानंतर, जेडीयू पुन्हा एकदा भाजपसोबत हातमिळवणी करू शकते, अशी चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू झाली आहे. यासंदर्भात, महाआघाडीतील बिहारमधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना प्रश्न विचारला असता, नितीश कुमार कुठेही जात नाहीत. भाजप हळूहळू कमकुवत होत चालला आहे आणि संपेल, असे ते म्हणाले.

गेल्या वर्षभरापासूनच जेडीयूमध्ये फूट पडणार असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र अद्याप असे काहीही झालेले नाही. ऑगस्ट 2022 मध्ये आरसीपी सिंह यांनी जेडीयूला राम राम ठोकला, तेव्हा वाटत होते की, जेडीयूतील काही लोक त्यांच्यासोबत जातील. मात्र कुणीही मोठा नेता त्यांच्यासोबत गेला नाही. तेव्हापासूनच जेडीयूमध्ये फूट पडण्याचे दावे केले जात आहेत.

नव्या संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी जेडीयूने बहिष्कार टाकला होता. मात्र, घटनात्मक पदावर असल्याने समारंभाला उपस्थित राहिलेले हरिवंश काही दिवसांपासून भाजपकडे झुकल्याचे मानले जात होते. यामुळे हरिवंश जेव्हा नितीश यांना भेटण्यासाठी पाटण्याला पोहोचले तेव्हा त्यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निरोप नितीश कुमारांसाठी आणल्याची चर्चा रंगली होती. मात्र जेडीयूने ही चर्चा फेटाळून लावत, नितीश पक्षाच्या आमदार आणि खासदारांना एक-एक करून भेटत आहेत आणि त्याच संदर्भात हरिवंशही त्यांना भेटायला आले, असे म्हटले होते.

तसेच, जेडीयू नेत्यांनी पुन्हा भाजपसोबत जाण्यासंदर्भात विचारले असता, या हवेतील गप्पा आहेत. नितीश कुमार भाजपचा पराभव करण्यासाठी संपूर्ण शक्तीनिशी विरोधकांना एकत्र करत आहेत, असे म्हटले होते.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBJPभाजपा