शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Video : बिहारच्या भागलपूरमध्ये गंगा नदीवर उभारला जाणारा पूल कोसळला, भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 07:58 IST

बिहार सरकारनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. यापूर्वीही वादळामुळे या ब्रिजचा काही भाग कोसळला होता.

बिहारमधील भागलपूरमध्ये गंगा नदीवर उभारण्यात येत असलेला पूल कोसळल्याची घटना रविवारी घडली. २०१४ मध्ये सीएम नितीश कुमार यांनी या पुलाची पायाभरणी केली होती. पूल कोसळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुलाच्या एका पिलरचे ३० हून अधिक स्लॅब गंगा नदीत पडत असल्याचे दिसत आहे. हा पूल उभारण्याची जबाबदारी एका खाजगी कंपनीकडे देण्यात आली होती. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी ३० एप्रिल २०२२ रोजी या पुलाच्या पिअर क्रमांक ४०५ आणि ६ मधील सुपर स्ट्रक्चर वाऱ्याच्या वेगाने कोसळलं होतं. त्यावेळीही या पुलाच्या बांधकामावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

चार लेनचा पूलमिळालेल्या माहितीनुसार, सुलतानगंज ते खगरिया दरम्यान बांधण्यात येत असलेला हा पूल चौपदरी होता. बांधकाम सुरू असलेल्या या पुलाचे सुपर स्ट्रक्चर नदीत कोसळले. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. पुलाचा काही भाग नदीत कोसळल्याचं पाहून घटनास्थळापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

दरम्यान, याबाबत चौकशीचे आगेश देण्यात आले असल्याची माहिती बिहार सरकारनं दिली. तपासादरम्यान पूल कोसळण्याच्या कारणांची माहिती घेतली जाईल, तसंच दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं बिहार सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय.

यापूर्वीही प्रश्नचिन्ह"हे पहिल्यांदा झालेलं नाही. यापूर्वीही २०२२ मध्ये वादळामुळे पुलाच्या वरचा भाग कोसळला होता. त्यावेळी विरोधात असूनही आम्ही प्रश्न उपस्थित केला होता. सरकारकडून आयआयटी रुरकीला तपास सोपवण्यात आला होता, ज्यांच्या रिपोर्टमध्ये अनेक बाबींचा उल्लेख होता. पुलच्या डिझाईनबाबत आम्हाला आधीच आमच्या मनात शंका होती," अशी प्रतिक्रिया बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिली.

भाजपचाही निशाणाया घटनेवरून भाजपनं मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधत यात भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. "या घटनेनं मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा पुरावा समोर आला. हा ब्रिज अनेक वर्षांपासून तयार होतोय आणि नीतीश कुमार यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. २०१४ मध्ये याची उभारणी सुरू करण्यात आली. याच्या खर्चात सातत्यानं वाढ करण्यात आली. गेल्या वर्षी वादळामुळे याचा भाग कोसळला होता. यावेळी कोणत्यातरी वाहनामुळे हा ब्रिज कोसळला. यावरून यात भ्रष्टाचार, चोरी आणि कमीशनखोरी झाल्याचं स्पष्ट होतंय. याचा स्वतंत्र आणि निष्पक्ष तपास झाला पाहिजे. नीतीश कुमार यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारावी," असं म्हणत भाजपनं जोरदार निशाणा साधलाय.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमार