शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

Video : बिहारच्या भागलपूरमध्ये गंगा नदीवर उभारला जाणारा पूल कोसळला, भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 07:58 IST

बिहार सरकारनं या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. यापूर्वीही वादळामुळे या ब्रिजचा काही भाग कोसळला होता.

बिहारमधील भागलपूरमध्ये गंगा नदीवर उभारण्यात येत असलेला पूल कोसळल्याची घटना रविवारी घडली. २०१४ मध्ये सीएम नितीश कुमार यांनी या पुलाची पायाभरणी केली होती. पूल कोसळल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुलाच्या एका पिलरचे ३० हून अधिक स्लॅब गंगा नदीत पडत असल्याचे दिसत आहे. हा पूल उभारण्याची जबाबदारी एका खाजगी कंपनीकडे देण्यात आली होती. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी ३० एप्रिल २०२२ रोजी या पुलाच्या पिअर क्रमांक ४०५ आणि ६ मधील सुपर स्ट्रक्चर वाऱ्याच्या वेगाने कोसळलं होतं. त्यावेळीही या पुलाच्या बांधकामावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

चार लेनचा पूलमिळालेल्या माहितीनुसार, सुलतानगंज ते खगरिया दरम्यान बांधण्यात येत असलेला हा पूल चौपदरी होता. बांधकाम सुरू असलेल्या या पुलाचे सुपर स्ट्रक्चर नदीत कोसळले. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. पुलाचा काही भाग नदीत कोसळल्याचं पाहून घटनास्थळापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला.

दरम्यान, याबाबत चौकशीचे आगेश देण्यात आले असल्याची माहिती बिहार सरकारनं दिली. तपासादरम्यान पूल कोसळण्याच्या कारणांची माहिती घेतली जाईल, तसंच दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं बिहार सरकारनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय.

यापूर्वीही प्रश्नचिन्ह"हे पहिल्यांदा झालेलं नाही. यापूर्वीही २०२२ मध्ये वादळामुळे पुलाच्या वरचा भाग कोसळला होता. त्यावेळी विरोधात असूनही आम्ही प्रश्न उपस्थित केला होता. सरकारकडून आयआयटी रुरकीला तपास सोपवण्यात आला होता, ज्यांच्या रिपोर्टमध्ये अनेक बाबींचा उल्लेख होता. पुलच्या डिझाईनबाबत आम्हाला आधीच आमच्या मनात शंका होती," अशी प्रतिक्रिया बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दिली.

भाजपचाही निशाणाया घटनेवरून भाजपनं मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधत यात भ्रष्टाचाराचा आरोप केलाय. "या घटनेनं मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा पुरावा समोर आला. हा ब्रिज अनेक वर्षांपासून तयार होतोय आणि नीतीश कुमार यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. २०१४ मध्ये याची उभारणी सुरू करण्यात आली. याच्या खर्चात सातत्यानं वाढ करण्यात आली. गेल्या वर्षी वादळामुळे याचा भाग कोसळला होता. यावेळी कोणत्यातरी वाहनामुळे हा ब्रिज कोसळला. यावरून यात भ्रष्टाचार, चोरी आणि कमीशनखोरी झाल्याचं स्पष्ट होतंय. याचा स्वतंत्र आणि निष्पक्ष तपास झाला पाहिजे. नीतीश कुमार यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारावी," असं म्हणत भाजपनं जोरदार निशाणा साधलाय.

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमार