शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

बिहारच्या राजकारणात ४ जूननंतर उलथापालथ होणार; नितीशकुमार पुन्हा मोठा निर्णय घेणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 12:38 IST

तेजस्वी यादव यांनी केलाय दावा; पक्षाला वाचविण्याचा प्रयत्न

एसपी सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: ४ जून रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मुख्यमंत्री नितीशकुमार पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. बिहारच्या राजकारणात ४ जूननंतर पुन्हा मोठी उलथापालथ होऊ शकते. आपल्या पक्षाला वाचवण्यासाठी ते हा निर्णय घेणार आहेत, असे तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. जेव्हा आरक्षण लागू झाले तेव्हा हे लोक शिवीगाळ करायचे. बाबासाहेबांनी राज्यघटना लिहिली, म्हणूनच भाजपला संविधानाचा तिरस्कार आहे, असे ते म्हणाले.

लेकीसाठी लालू यादव उतरले प्रचारात

सातव्या टप्प्यात बिहारमधील पाटलीपुत्र लोकसभा जागेसाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. अशा स्थितीत राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासाठी पाटलीपुत्र ही जागा प्रतिष्ठेची बनली आहे. येथे लालू यादव यांनी त्यांची मोठी मुलगी मीसा भारती यांना उमेदवारी दिली आहे. मीसा भारती यांचा विजय निश्चित करण्यासाठी लालू यादव यांनी स्वतः प्रचाराला सुरुवात केली आहे. लालू यादव मंगळवारी मीसा यांच्यासाठी मते मागण्यासाठी बाहेर पडले. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठे भाकीत केले.

४ जून रोजी इंडियाचे सरकार येणार

नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपद जाणे निश्चित असल्याचे लालू यादव म्हणाले. ते म्हणाले की, देशात ४ जून रोजी इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. आम्ही अवतार आहोत, असे मोदी सांगत आहेत, पण ४ जून रोजी निकालानंतर नेमके काय ते कळेल.

दरम्यान, निवडणूक प्रचारासाठी बाहेर पडलेले लालू यादव आज मुस्लीम समाजाची सर्वांत मोठी इमारत शरिया येथे पोहोचले. यावेळी खानकाहमध्ये लालू यादव आणि पीर साहेब यांच्यात दीर्घ संवाद झाला. दोघांमध्ये काय चर्चा झाली हे समजू शकलेले नाही.

 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवTejashwi Yadavतेजस्वी यादव