शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

Bihar Politics : आजकाल प्रचार फक्त दिल्लीतील लोकांचाच, आम्हाला जनतेनं मुख्यमंत्री बनवलं; नितिश कुमारांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2022 18:24 IST

नितीश म्हणाले, केवळ दिल्लीतील केंद्र सरकारचीच चर्चा होते. सोशल मिडियापासून ते टीव्हीपर्यंत त्यांचाच प्रचार सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी दिल्लीवाल्यांचाच कब्जा आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुधवारी विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेनंतर सभागृहाला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) जोरदार हल्ला चढवला. नितीश म्हणाले, केवळ दिल्लीतील केंद्र सरकारचीच चर्चा होते. सोशल मिडियापासून ते टीव्हीपर्यंत त्यांचाच प्रचार सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी दिल्लीवाल्यांचाच कब्जा आहे. एवढेच नाही, तर, आम्हाला कुणी दुसऱ्याने नव्हे, तर जनतेने मुख्यमंत्री बनवले आहे, असेही नितीश यावेळी म्हणाले.

आणखी काय म्हणाले नितीश? - नीतीश म्हणाले, विश्वासदर्शक ठरावावर बरीच चर्चा झाली. सर्वांनीच आपापले म्हणणे मांडले. आम्हाला कुणावरही हरकत नाही. आधी चार पक्षांचे सरकार होते. एक पक्षाला तर स्वतःत विलीन करून घेतले. आम्ही तर काम करत होतो, तर मग काय होत होते. आपल्या संदर्भात आमची कुठलीही तक्रार नाही. आम्ही आपल्याला काहीही म्हणत नाही.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या भाषणादरम्यान पाटणा युनिव्हर्सिटीला सेंट्रल व्हिव्हि बनविण्याची मागणी केली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाव न घेता, अरसीपी सिंह यांच्यावरही हल्ला चढवला. ते म्हणाले, आम्ही ज्याला वर नेले, त्याला आपल्यात सामील करून काय केले. आमच्या पक्षातील लोक म्हणत होते, की सर्व गडबड झाली. विधानसभा निवडणुकीत काय केले, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक जुन्या नेत्यांना हटविले. आजकल प्रचार फक्त दिल्लीतील लोकांचाच होतो, असेही नितीश यावेळी म्हणाले.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारPoliticsराजकारणBJPभाजपा