शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

'माझ्या मूर्खपणामुळे ते मुख्यमंत्री झाले', जीतन राम मांझी आणि नितीश कुमारांमध्ये शाब्दिक चकमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 17:43 IST

बिहार विधानसभेत जात सर्वेक्षण आणि आरक्षणाची व्याप्ती वाढवण्याबाबत चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यात जोरदार वाद झाला.

Bihar Politics: बिहार विधानसभेत (Bihar Politics) गुरुवारी जात सर्वेक्षण आणि आरक्षणाची व्याप्ती वाढवण्याबाबत चर्चा झाली. यादरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) यांच्यात जोरदार वाद झाला. 'मांझी माझ्या मूर्खपणामुळेच मुख्यमंत्री बनले', असे वक्तव्य नितीश कुमारांनी केले. 

चर्चेदरम्यान माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी म्हणाले होते की, बिहारची जात जनगणना योग्य प्रकारे झालीये, यावर आमचा विश्वास नाही. डेटा चुकीचा असेल तर त्याचे फायदे योग्य लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत. यावेळी नितीश यांना अचानक राग आला. 'या माणसाला (मांझी) काही कल्पना आहे का. आम्हीच त्यांना मुख्यमंत्री केले. दोन महिन्यातच माझ्या पक्षाचे लोक काढा म्हणू लागले. माझ्या मूर्खपणामुळे ते मुख्यमंत्री झाले,' असे वक्तव्य नितीश कुमारांनी केले.

नितीश पुढे म्हणाले की, त्यांना (मांझी) राज्यपाल व्हायचे आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदारांकडे बोट दाखवत म्हटले, त्यांना राज्यपाल करा. यानंतर प्रकरण अधिकच चिघळत असल्याचे पाहून सत्ताधारी पक्षातील काही आमदार आणि तेजस्वी यादव यांनी नितीश यांना शांत केले. नंतर विजयकुमार चौधरी यांनीही नितीश यांना रोखले.

नितीश यांनीच मांझींना मुख्यमंत्री केलेजीतन राम मांझी नितीश कुमारांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक होते. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत जेडीयूचा दारुण पराभव झाला, तेव्हा नितीश यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि 9 मे 2014 रोजी जितन राम मांझी यांच्याकडे हे पद सोपवले. सुरुवातीला मांझी यांना 'रिमोट कंट्रोल सीएम' म्हटले जायचे, पण हळूहळू मांझी स्वत: मोठे निर्णय घेऊ लागले, यामुळेच नितीशपासून त्यांचे अंतर वाढले. परिस्थिती हळूहळू बिघडली आणि पक्षाने मांझींना राजीनामा देण्यास सांगितले, पण त्यांनी नकार दिला. त्यानंतर त्यांची जेडीयूमधून हकालपट्टी करण्यात आली. 

75% आरक्षण विधेयक मंजूरविधानसभेत गदारोळ होण्यापूर्वी 75 टक्के आरक्षणाचे विधेयक विनाविरोध मंजूर झाले. बिहारमध्ये सध्या आरक्षणाची मर्यादा 50 ० टक्के आहे. EWS ला यातून वेगळे 10% आरक्षण मिळते. आता नितीश यांच्या प्रस्तावाचे कायद्यात रूपांतर झाल्यास 50% आरक्षणाची मर्यादा मोडेल आणि बिहारमध्ये एकूण 65  टक्के आरक्षण मिळेल. याशिवाय EWS साठी 10% आरक्षण वेगळे राहील.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारPoliticsराजकारणElectionनिवडणूक