शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

'भाजपने भावी पंतप्रधानांना मुख्यमंत्रीपदावरच रोखले', अखिलेश यादव यांची शेलक्या शब्दात टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 20:06 IST

नितीश कुमार यांनी एनडीओसोबत सत्ता स्थापन केल्यामुळे विविध पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Bihar Politics: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीपासून फारकत घेतली असून, एनडीएसोबत बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन केले आहे. आतापर्यंत राजदसोबत सरकार चालवणारे नितीश कुमार आता भाजपसोबत सरकार चालवतील. त्यांच्या या कृत्यामुळे इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अखिलेश यादव म्हणाले की, भाजपने षडयंत्र रचून भावी पंतप्रधानांना मुख्यमंत्रीपदावरच रोखले. भाजपने बिहारच्या जनतेचा आणि जनमताचाही अपमान केला आहे. या अपमानाला जनता लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून प्रत्युत्तर देईल. बिहारचा प्रत्येक रहिवासी बिहारची इज्जत वाचवण्यासाठी आणि भाजपला पराभूत करण्यासाठी पुढील मतदान करेल.

दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की, देशात 'आया राम-गया राम' असे अनेक लोक आहेत. पूर्वी ते आणि आम्ही एकत्र लढत होतो. मी लालूजी आणि तेजस्वी यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनीही नितीश जात असल्याचे सांगितले. त्यांना राहायचे असते तर ते राहिले असते, पण त्यांना जायचे होते. आम्हाला हे आधीच माहीत होते, पण इंडिया आघाडी अबाधित ठेवण्यासाठी आम्ही काहीही बोललो नाही. आम्ही काही चुकीचे बोललो तर चुकीचा संदेश गेला असता. 

शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी नितीश यांच्यावर हल्लाबोल करत 'अयोध्येत राम आणि बिहारमध्ये पलटूराम' असे म्हटले. नितीश हे मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे सांगून राऊत म्हणाले की, इंडिया आघाडी सुस्थितीत आहे. ममता बॅनर्जी अजून बाहेर गेल्या नाहीत. आम आदमी पक्षही वेगळा झालेला नाही. काँग्रेस, तेजस्वी यादव आणि इतर छोटे पक्ष आमच्यासोबत आहेत. नितीश कुमार आमच्यापासून दूर गेल्याने बिहारच्या राजकारणात काही फरक पडणार नाही. 

आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले की, नितीश कुमार हे थकलेले मुख्यमंत्री होते, आम्ही त्यांच्याकडून कामे करुन घेतली. तरुणांना नोकऱ्या देण्याचे आमचे व्हिजन होते. बिहारमध्ये 17 महिन्यांत ऐतिहासिक कामे झाली. आम्ही आघाडीचे तत्व पाळले. हा खेळ अजून संपलेला नाही, जेडीयू 2024 मध्ये संपणार, अशी टीका त्यांनी केली. 

 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारAkhilesh Yadavअखिलेश यादवBiharबिहारPoliticsराजकारणcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी