शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

'भाजपने भावी पंतप्रधानांना मुख्यमंत्रीपदावरच रोखले', अखिलेश यादव यांची शेलक्या शब्दात टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 20:06 IST

नितीश कुमार यांनी एनडीओसोबत सत्ता स्थापन केल्यामुळे विविध पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Bihar Politics: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीपासून फारकत घेतली असून, एनडीएसोबत बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन केले आहे. आतापर्यंत राजदसोबत सरकार चालवणारे नितीश कुमार आता भाजपसोबत सरकार चालवतील. त्यांच्या या कृत्यामुळे इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अखिलेश यादव म्हणाले की, भाजपने षडयंत्र रचून भावी पंतप्रधानांना मुख्यमंत्रीपदावरच रोखले. भाजपने बिहारच्या जनतेचा आणि जनमताचाही अपमान केला आहे. या अपमानाला जनता लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून प्रत्युत्तर देईल. बिहारचा प्रत्येक रहिवासी बिहारची इज्जत वाचवण्यासाठी आणि भाजपला पराभूत करण्यासाठी पुढील मतदान करेल.

दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की, देशात 'आया राम-गया राम' असे अनेक लोक आहेत. पूर्वी ते आणि आम्ही एकत्र लढत होतो. मी लालूजी आणि तेजस्वी यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनीही नितीश जात असल्याचे सांगितले. त्यांना राहायचे असते तर ते राहिले असते, पण त्यांना जायचे होते. आम्हाला हे आधीच माहीत होते, पण इंडिया आघाडी अबाधित ठेवण्यासाठी आम्ही काहीही बोललो नाही. आम्ही काही चुकीचे बोललो तर चुकीचा संदेश गेला असता. 

शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी नितीश यांच्यावर हल्लाबोल करत 'अयोध्येत राम आणि बिहारमध्ये पलटूराम' असे म्हटले. नितीश हे मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे सांगून राऊत म्हणाले की, इंडिया आघाडी सुस्थितीत आहे. ममता बॅनर्जी अजून बाहेर गेल्या नाहीत. आम आदमी पक्षही वेगळा झालेला नाही. काँग्रेस, तेजस्वी यादव आणि इतर छोटे पक्ष आमच्यासोबत आहेत. नितीश कुमार आमच्यापासून दूर गेल्याने बिहारच्या राजकारणात काही फरक पडणार नाही. 

आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले की, नितीश कुमार हे थकलेले मुख्यमंत्री होते, आम्ही त्यांच्याकडून कामे करुन घेतली. तरुणांना नोकऱ्या देण्याचे आमचे व्हिजन होते. बिहारमध्ये 17 महिन्यांत ऐतिहासिक कामे झाली. आम्ही आघाडीचे तत्व पाळले. हा खेळ अजून संपलेला नाही, जेडीयू 2024 मध्ये संपणार, अशी टीका त्यांनी केली. 

 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारAkhilesh Yadavअखिलेश यादवBiharबिहारPoliticsराजकारणcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी