शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

'भाजपने भावी पंतप्रधानांना मुख्यमंत्रीपदावरच रोखले', अखिलेश यादव यांची शेलक्या शब्दात टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 20:06 IST

नितीश कुमार यांनी एनडीओसोबत सत्ता स्थापन केल्यामुळे विविध पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Bihar Politics: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीपासून फारकत घेतली असून, एनडीएसोबत बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन केले आहे. आतापर्यंत राजदसोबत सरकार चालवणारे नितीश कुमार आता भाजपसोबत सरकार चालवतील. त्यांच्या या कृत्यामुळे इंडिया आघाडीतील मित्रपक्षांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अखिलेश यादव म्हणाले की, भाजपने षडयंत्र रचून भावी पंतप्रधानांना मुख्यमंत्रीपदावरच रोखले. भाजपने बिहारच्या जनतेचा आणि जनमताचाही अपमान केला आहे. या अपमानाला जनता लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून प्रत्युत्तर देईल. बिहारचा प्रत्येक रहिवासी बिहारची इज्जत वाचवण्यासाठी आणि भाजपला पराभूत करण्यासाठी पुढील मतदान करेल.

दरम्यान, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की, देशात 'आया राम-गया राम' असे अनेक लोक आहेत. पूर्वी ते आणि आम्ही एकत्र लढत होतो. मी लालूजी आणि तेजस्वी यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनीही नितीश जात असल्याचे सांगितले. त्यांना राहायचे असते तर ते राहिले असते, पण त्यांना जायचे होते. आम्हाला हे आधीच माहीत होते, पण इंडिया आघाडी अबाधित ठेवण्यासाठी आम्ही काहीही बोललो नाही. आम्ही काही चुकीचे बोललो तर चुकीचा संदेश गेला असता. 

शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी नितीश यांच्यावर हल्लाबोल करत 'अयोध्येत राम आणि बिहारमध्ये पलटूराम' असे म्हटले. नितीश हे मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे सांगून राऊत म्हणाले की, इंडिया आघाडी सुस्थितीत आहे. ममता बॅनर्जी अजून बाहेर गेल्या नाहीत. आम आदमी पक्षही वेगळा झालेला नाही. काँग्रेस, तेजस्वी यादव आणि इतर छोटे पक्ष आमच्यासोबत आहेत. नितीश कुमार आमच्यापासून दूर गेल्याने बिहारच्या राजकारणात काही फरक पडणार नाही. 

आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले की, नितीश कुमार हे थकलेले मुख्यमंत्री होते, आम्ही त्यांच्याकडून कामे करुन घेतली. तरुणांना नोकऱ्या देण्याचे आमचे व्हिजन होते. बिहारमध्ये 17 महिन्यांत ऐतिहासिक कामे झाली. आम्ही आघाडीचे तत्व पाळले. हा खेळ अजून संपलेला नाही, जेडीयू 2024 मध्ये संपणार, अशी टीका त्यांनी केली. 

 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारAkhilesh Yadavअखिलेश यादवBiharबिहारPoliticsराजकारणcongressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी