शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
3
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
4
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
5
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
6
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
7
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
8
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
9
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
10
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
11
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
12
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
13
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
14
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
15
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
16
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
17
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
18
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
19
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
20
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO

"... हे पाप नितीश कुमार कसं करू शकतात?"; शिवानंद तिवारींनी 'त्या' गोष्टीची करुन दिली आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 11:01 IST

Bihar Politics Nitish Kumar And Shivanand Tiwari : बिहारमधील राजकीय परिस्थितीवर RJD नेते शिवानंद तिवारी म्हणाले की, मी सध्या काही बोलू शकत नाही.

बिहारमध्ये जेडीयू आणि भाजपामध्ये जुन्या फॉर्म्युल्यावर मंथन सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवे सरकार स्थापन झाल्यास नितीश कुमार मुख्यमंत्री असतील. भाजपाच्या कोट्यातून दोन उपमुख्यमंत्री असतील. नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएचा भाग होऊ शकतात. याच दरम्यान, RJD ने नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

बिहारमधील राजकीय परिस्थितीवर RJD नेते शिवानंद तिवारी म्हणाले की, मी सध्या काही बोलू शकत नाही. या प्रकरणावर फक्त लालू प्रसाद यादव किंवा तेजस्वी यादवच भाष्य करू शकतात. नितीश कुमार म्हणाले होते की, ते पुन्हा कधीही भाजपामध्ये (एनडीएसोबत) सामील होणार नाहीत, मग ते कसे जाऊ शकतात. आजही मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण कोणतंच उत्तर मिळालं नाही.

शिवानंद तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांचा एक कार्यक्रम नितीश कुमार यांनी रद्द केला. नितीश कुमार म्हणाले होते की, मी जाणार नाही, आरएसएस मुक्त देश बनवू पण आम्ही जाणार नाही. असं बोलल्यावर पण कशी यांची हिंमत झाली. आम्ही खूप प्रयत्न केले, पण वेळ मिळाला नाही.

बिहारमध्ये अनेक ठिकाणी असे बोर्ड लावण्यात आले आहेत, जे नितीश कुमार यांनी लावले आहेत, ज्यामध्ये गांधीजींचे तत्वज्ञान सांगण्यात आले आहे, ज्यामध्ये  सात पापांचा उल्लेख केला आहे. त्यातलं पहिलं पाप हे सिद्धांतहीन राजकारण होतं, मग त्या पापाचे पापी नितीश कुमार कसे काय बनू शकतात. आज त्यांनी जमिनीच्या बदल्यात नोकऱ्या देण्याबाबत जे काही म्हटलं आहे ती नवीन गोष्ट नाही असंही शिवानंद तिवारी यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारPoliticsराजकारणBJPभाजपा