शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

“बंदुकीचा धाक दाखवून बळजबरीने केलेला विवाह बेकायदा”; हायकोर्टाचा ऐतिहासिक आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 13:02 IST

जबरदस्तीने विवाह करण्याबाबत हायकोर्टाने महत्त्वाचा आदेश दिला आहे.

Patna High Court: बंदुकीचा धाक दाखवून बळजबरीने केलेला विवाह हा बेकायदा आहे, असा महत्त्वाचा निकाल बिहारमधील पाटणा उच्च न्यायालयाने दिला आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार, अशा प्रकारे केलेला विवाह योग्य नाही. जोपर्यंत दोन्ही व्यक्तींची विवाह करण्याबाबत सहमती नसेल, इच्छा नसेल तसेच सप्तपदीचा विधी पूर्ण होत नाही, तोपर्यंत तो विवाह कायदेशीर मानला जात नाही, असे पाटणा उच्च न्यायालयाने नमूद केले. 

भारतीय सैन्यातील एका व्यक्तीचा विवाह पाटणा उच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. १० वर्षांपूर्वी बंदुकीचा धाक दाखवत या व्यक्तीचा जबरदस्तीने विवाह करण्यात आला होता. याचिकाकर्ता रविकांत यांचे २०१३ रोजी अपहरण करण्यात आले होते. लखीसराय येथे एका मंदिरात दर्शनासाठी रविकांत गेले होते, त्यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी रविकांत यांचे अपहरण केले आणि त्यांचा विवाह लावून दिला. हुंडा द्यावा लागू नये, यासाठी नवरदेवाचे अपहरण करून लग्न लावून देण्यात होते. बिहारमध्ये ही एक सामाजिक कुप्रथा मानली जात होती. विवाहाचे सर्व विधी पूर्ण व्हायच्या आधीच रविकांत लग्नमंडपातून पळून गेले आणि जम्मू-काश्मीर येथे कामावर रुजू झाले. त्यानंतर सुट्टीवर असताना हा विवाह रद्द करण्यात यावा, अशी याचिका लखीसराय कुटुंब न्यायालयात केली होती. मात्र, सन २०२० मध्ये कुटुंब न्यायालयाने ही याचिका फेटळाली होती. 

रविकांत यांनी उच्च न्यायालयात मागितली दाद

कुटुंब न्यायालयाच्या निर्णयाविरोधात रविकांत यांनी पाटणा उच्च न्यायालयात दाद मागितली. पाटणा उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द केला. याचिका दाखल करण्यास खूप उशीर झाला, या कारणास्तव कुटुंब न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. न्यायालयाचा असा दृष्टिकोन चुकीचा होता, असे पाटणा उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. हिंदू परंपरेनुसार ‘सप्तपदी’ विधी केल्याशिवाय कोणताही विवाह वैध ठरू शकत नाही. सप्तपदी विधी न करणे म्हणजे विवाह सोहळा झालाच नाही, असे नाही, असे म्हणणे योग्य नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयmarriageलग्न