शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019: बिहारच्या जनतेचा कौल कुणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 09:29 IST

Bihar Lok Sabha Election Results Live Vote Counting: उत्तर प्रदेश, महाराष्ट्रनंतर बिहार राज्याचा निकाल केंद्रातील सत्ता स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे

पटणा -  २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बिहारचा निकाल महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहे. बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहेत. यातील सर्वाधिक जागा जिंकेल ते केंद्राच्या सत्ता स्थापनेत निर्णायक भूमिका बजावेल. त्याचमुळे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जुने राजकीय मतभेद विसरत पुन्हा एकदा मुख्यमंत्री नितीश कुमार यांना जवळ केलं आहे.

२०१३ मध्ये पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावरून नितीश कुमार यांनी एनडीएपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर झालेल्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांनी एकत्र येत राज्यात सत्ता मिळवली होती. मात्र काही महिन्यात नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्याशी फारकत घेत पुन्हा भाजपाशी घरोबा केला.  २०१४ मध्ये नितीश कुमार यांच्या जेडीयूला २ जागा मिळाल्या होत्या असं असतानाही बिहारमध्ये सध्याच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने जेडीयूला १७ जागा सोडल्या आहेत. बिहारमध्ये १५ टक्के मतांवर जेडीयूचा प्रभाव आहे. त्यामुळे ही मते सत्ता स्थापनेसाठी महत्त्वाची ठरतात त्यामुळेच ही मते ज्याच्या पारड्यात पडतील त्यांच्या जागा वाढतील म्हणूनच भाजपाने जेडीयूशी तडजोड करण्याची भूमिका घेतली.  

बिहारमधील ५० टक्के मतांवर भाजपा आणि जेडीयूचा प्रभाव आहे. तर ३० टक्के मतांवर काँग्रेस आणि लालू यादव यांच्या आरजेडीचा प्रभाव आहे. तर इतर २० टक्के मते निर्णायक असतात. बिहारमध्ये जातीय समीकरणे बघितली तर शहरी भाग, पुरुष आणि उच्च जातींवर भाजपाचा प्रभाव आहे तर जेडीयूवर ग्रामीण महिला, मागासवर्गीय जातींचा पगडा आहे. त्यामुळे बिहारची जनता कोणाला साथ देते याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. 

बिहारमध्ये लोकसभेच्या ४० जागा आहे त्यात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला २२ जागा, काँग्रेसला २ जागा, एनसीपी १, जेडीयू २, लोक जनशक्ती पार्टी ६, राष्ट्रीय जनता दल(आरजेडी) ४ आणि इतरांना ३ जागा मिळाल्या होत्या. 

उत्तर प्रदेश, महाराष्ट्रनंतर बिहार राज्याचा निकाल केंद्रातील सत्ता स्थापनेसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. जातीयवादाचा प्रभाव असणाऱ्या बिहारमध्ये एकूण ४० जागांपैकी ३४ जागा अनारक्षित तर ६ जागा आरक्षित आहे. देशाच्या राजकारणात बिहारची भूमिका महत्त्वाची असते. सध्या याठिकाणी आरजेडीचे लालूप्रसाद यादव, जेडीयूचे नितीश कुमार, रामविलास पासवान, शरद यादव, उपेंद्र कुशवाह, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, शकील अहमद, राजीव प्रताप रुडी या नेत्यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Bihar Lok Sabha Election 2019बिहार लोकसभा निवडणूक निकाल 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस