शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

Bihar Liquor Ban: बिहारचे हायटेक पोलीस, हेलिकॉप्टरमधून शोधणार राज्यातील दारुचे अड्डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 22:15 IST

Bihar Liquor Ban: या मोहिमेअंतर्गत मंगळवारी पहिल्याच दिवशी 5 अवैध दारुच्या अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली.

पाटणा: बिहारमध्ये दारुबंदी आहे, पण यातही अनेक ठिकाणी दारुचे अवैध अड्डे सुरू आहेत. आता हे अवैध अड्डे शोधण्यासाठी राज्य सरकारने नवीन मार्गाचा अवलंब केला आहे. बिहार पोलिसांनी फ्लाइंग स्क्वॉड आणि ड्रोनद्वारे अवैध दारू अड्डे शोधण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सरकारने ब्रिटन-अमेरिकेच्या धर्तीवर हे अड्डे शोधण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर सुरू केला आहे.

पहिल्याच दिवशी कारवाईया मोहिमेअंतर्गत मंगळवारी पहिल्याच दिवशी अवैध दारू व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. दारुबंदी आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरने पाटणा ते गंगेच्या काठावरील भागाचे हवाई सर्वेक्षण केले आणि 5 अवैध दारुचे अड्डे शोधले. अधिकाऱ्यांनी संबंधित पोलिस आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना कळवले आहे. आता हे अधिकारी पुढील कारवाई करतील. त्याचा व्हिडिओही विभागाने जारी केला आहे.

दररोज 6 ते 7 तास चालेल ऑपरेशन हेलिकॉप्टरच्या सहाय्याने संपूर्ण बिहारमध्ये अवैध दारुची दुकाने शोधली जाणार आहेत. तसेच, त्या त्या-त्या भागातील पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांना सांगून ते अड्डे उद्ध्वस्त केली जातील. दारुबंदी विभागाने तयार केलेल्या आराखड्यानुसार बक्सर ते कटिहार आणि गंगा नदीपर्यंत 11 भागात सतत सर्वेक्षण केले जाणार आहे.

हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह 5 लोक बसू शकतातहे हेलिकॉप्टर दररोज 6 ते 7 तास सतत ऑपरेशन करू शकते. विमानाच्या प्रत्येक तासाला 75 हजार ते एक लाख रुपये खर्च येईल. हवाई सर्वेक्षणादरम्यान, उत्पादन विभागाच्या अधिका-यांसह अभियंते आणि सपोर्ट डिटेक्शन तज्ञ देखील उपस्थित राहणार आहेत. सपोर्ट डिटेक्शन तज्ञ क्षेत्र ओळखतील आणि ठिकाण चिन्हांकित करतील. 

विषारी दारुमुळे 5 महिन्यांत 57 जणांचा मृत्यूदारुबंदीनंतरही बिहारमध्ये सतत बनावट दारू पिऊन अनेकांना जीव गमवावा लागत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये बेतियातील नौतन ब्लॉकच्या दक्षिण तेल्हुआ गावात बनावट दारूमुळे 16 लोकांचा मृत्यू झाला होता. तर, गोपालगंजमध्येही बनावट दारू प्यायल्याने 18 जण दगावले. याशिवाय, डिसेंबरमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. 2022 मध्येही विषारी दारुचा कहर सुरूच आहे. जानेवारीच्या पहिल्याच दिवशी नालंदामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Biharबिहारliquor banदारूबंदीNitish Kumarनितीश कुमार