शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

Coronavirus: कोरोनाचे मृत्यू लपवले! राज्यात ९,३७५ जणांनी गमावले प्राण; बिहार सरकारची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 11:24 IST

Coronavirus: बिहार सरकारने राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी दाखवल्याबाबत कबुली देत मोठा खुलासा केला आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे राज्यात ९,३७५ जणांनी गमावले प्राणबिहार सरकारची कबुली

पाटणा: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशाला मोठा फटका बसला. कोरोनामुळे होणारे मृत्यूही चिंतेत भर टाकणारे होते. नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येसह कोरोनामुळे होणारे मृत्यूही नवीन उच्चांक गाठणारे ठरले. या पार्श्वभूमीवर देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनामुळे होणारे मृत्यू लपवले जात असल्याचा आरोप केला जात होता. यातच आता बिहार सरकारने राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी दाखवल्याबाबत कबुली देत मोठा खुलासा केला आहे. बिहारमध्ये कोरोनामुळे तब्बल ९ हजार ३७५ जणांनी आपले प्राण गमावले अशी माहिती मिळाली आहे. (bihar govt itself admitted that deaths due to corona were hidden)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतमुळे बिहारमध्येही मृत्यूंचे प्रमाण वाढल्याचे सांगितले जात होते. पाटणा उच्च न्यायालयानेही अनेकदा सरकारी आकड्यांवर आक्षेप नोंदवत बिहार सरकारला फटकारले होते. गंगा नदीच्या किनारी मिळणारे मृतदेह आणि अंत्यसंस्कारांचा आकडा यात तफावत असल्याचे सातत्याने म्हटले जात होते. अखेर बिहार सरकारच्या आरोग्य विभानाने यासंदर्भातील कबुली देत मोठा खुलासा केला आहे. 

कोरोनामुळे होणारे मृत्यू लपवले

आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत बिहारमध्ये ५ हजार ४२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगितले गेले. मात्र, सदर आकडेवारी चुकीची असून, वास्तविक पाहता, याच कालावधीत बिहारमध्ये तब्बल ९ हजार ३७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. १८ मे रोजी सरकारच्यावतीने कोरोना मृत्यूंच्या आकडेवारीबाबत तपास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी दोन पथकांची स्थापना करण्यात आली होती, अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत एका दिवसात सर्वाधिक म्हणजे ६,१४८ करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. तर, ९४ हजार ५२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, ०१ लाख ५१ हजार ३६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले. देशभरात बुधवारी दिवसभरात ३३ लाख ७९ हजार २६१ नागरिकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली. त्यामुळे लस घेतलेल्या एकूण नागरिकांची संख्या आता २४ कोटी २७ लाख २६ हजार ६९३ वर पोहोचली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारState Governmentराज्य सरकारCorona vaccineकोरोनाची लस