शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

पाकिस्तानच्या विजयानंतर फटाके फुटले; पोलीस तपासात भलतेच प्रकरण समोर आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 10:02 IST

पाकिस्तानच्या विजयानंतर भारतात काही ठिकाणी फटाके फुटले

पाटणा: टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताननं भारताचा धुव्वा उडवत १० गडी राखून विजय मिळवला. विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानकडून कधीच पराभूत न झालेल्या टीम इंडियाला यंदा एकतर्फी पराभव पत्करावा लागला. यानंतर पाकिस्तानात एकच जल्लोष झाला. भारतातही काही ठिकाणी फटाके फुटले. त्याबद्दलच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. असाच एक प्रकार बिहारमध्ये घडला होता. त्यामुळे सोशल मीडियावर वादंग माजला. मात्र पोलीस तपासातून भलतीच माहिती समोर आली. 

बिहारच्या किशनगंजमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यानंतर फटाके फुटले. त्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या. लोकांनी कमेंटमधून फटाके फोडले. अनेकांनी रोष व्यक्त केला. किशनगंजच्या माजी आमदारांनी फटाके फोडणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. प्रकरण तापताच पोलिसांनी तपास हाती घेतला. एका गैरसमजातून हा संपूर्ण प्रकार घडल्याचं तपासातून उघडकीस आलं.

पाकिस्तानच्या विजयानंतर किशनगंजमध्ये आतषबाजी, असा मजकूर असलेली पोस्ट किशनगंज हलचल नावाच्या फेसबुक पेजवर रविवारी प्रसिद्ध झाली. थोड्याच वेळात पोस्ट व्हायरल झाली. किशनगंजच्या पोलीस अधीक्षकांनी तपासाचे आदेश दिले. पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलावण्यात आलं. त्याची चौकशीतून वेगळीच माहिती समोर आली.

पोस्ट करणाऱ्या व्यक्तीच्या घराजवळ विवाह सोहळा संपन्न झाला. त्यामुळे फटाके फोडण्यात आले. मात्र पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचा मोठा गैरसमज झाला. पाकिस्तानी संघ जिंकल्यानं फटाके फोडले जात असल्याचं त्याला वाटलं. त्यानं लगेच फेसबुकवर पोस्ट केली. कोणत्याही पडताळणीशिवाय ही पोस्ट करण्यात आली. त्याबद्दल संबंधित व्यक्तीनं माफीनामा दिला असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

टॅग्स :T20 World Cupट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान