शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
4
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
5
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
6
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
7
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
8
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
9
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
10
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
11
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
12
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
13
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
14
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
15
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
16
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
17
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
18
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
19
Diwali 2025: फराळ तयार करताना तळणीच्या 'या' वेळा फॉलो करा; पदार्थ तेल कमी पितील आणि खुसखुशीत होतील!
20
VIDEO : गिलनं पहिली ट्रॉफी जिंकताच धोनी-विराट-रोहितची परंपरा जपली! पण...

'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 11:50 IST

Prashant Kishor on Nitish Kumar: 'भाजपला बिहारमध्ये स्वबळावर सत्ता मिळवता येणार नाही.'

Prashant Kishor on Nitish Kumar: जनसुराज पक्षाचे संस्थापक आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल एक मोठी भविष्यवाणी केली आहे. या वर्षी होणाऱ्या निवडणुकीनंतर नितीश कुमारबिहारचे मुख्यमंत्री राहणार नाहीत. बिहारमधील ६० टक्क्यांहून अधिक लोकांना बदल हवा आहे, असा दावा पीके यांनी केला आहे.

प्रशांत किशोर म्हणाले की, 'मी लिहून देतो, नितीश कुमार मुख्यमंत्री राहणार नाहीत. पुढील दोन महिन्यांत चित्र स्पष्ट होईल. राज्यातील ६० टक्क्यांहून अधिक लोकांना बदल हवाय. ज्यांनी लोकांना निराश केले, त्यांना ते पुन्हा मतदान करतील का? ते त्यांच्यावर विश्वास ठेवतील का? की ते नवीन पर्याय निवडतील? कोणत्याही परिस्थितीत, नोव्हेंबरनंतर नितीश कुमार निश्चितच मुख्यमंत्री राहणार नाहीत. बिहारला एक नवीन मुख्यमंत्री मिळेल,' असा दावा त्यांनी केला आहे.

मोदी आणि शांहांना नितीश कुमारांची स्थिती माहित नाही का? एनडीटीव्ही मुलाखतीत पीके यांना विचारण्यात आले की, ते इतक्या विश्वासाने हा दावा कसाकाय करू शकतात? यावर त्यांनी नितीश कुमारांच्या 'मानसिक आणि शारीरिक स्थिती'कडे लक्ष वेधले. ते म्हणाले, 'संपूर्ण बिहारला माहित आहे की, नितीश कुमार काहीही करण्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीत नाहीत. जो व्यक्ती स्टेजवर शेजारी बसलेल्या पंतप्रधानांचे नाव विसरतो; ज्याला राष्ट्रगीत वाजल्यावर ते राष्ट्रगीत आहे की, कव्वाली हे माहित नाही... ज्याने वर्षभरात माध्यमांना संबोधित केले नाही. जो व्यक्ती स्वतःची काळजी घेण्याच्या स्थितीत नाही. तो बिहारची काळजी कशी घेईल? हे तुम्हाला आणि मला कळत असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना कळत नाही का?'

भाजपने नितीश कुमारांना मुख्यमंत्री का केले?'निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने नितीश कुमारांना मुख्यमंत्रिपदावर ठेवले आहे. भाजपकडे बिहारमध्ये स्वबळावर निवडणुका लढण्याची तयारी किंवा आत्मविश्वास नाही. म्हणूनच, त्यांनी नितीश कुमारांना तिथे बसवले आहे. पण, तुम्ही लिहून ठेवा, यंदा जेडीयूला २५ पेक्षा कमी जागा मिळणार आहेत. निवडणुकीनंतर जेडीयूच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. नितीश कुमार यांचे रेटिंग ६०% वरुन १६-१७% पर्यंत खाली आले आहे. जेडीयूकडे कोणताही केडर नाही. त्यांच्याकडे फक्त नितीश कुमार होते आणि आता तेही गेले आहेत. जर असे झाले नाही, तर मी राजकारण सोडेन,' असे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारPrashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी