शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 22:02 IST

“भारतीय सेनेवर देशाच्या केवळ 10 टक्के लोकसंख्येचे नियंत्रण आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते बिहारच्या कुटुम्बा येथे प्रचारसभेत बोलत होते. राहुल यांच्या या विधानावर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया देत, ते “भारतीय सेन्य विरोधी” असल्याचे म्हटले आहे.

बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण जबरदस्त तापले आहे. मैदानात असलेले सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच आज, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी थेट भारतीय सेन्यासंदर्भातच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “भारतीय सेनेवर देशाच्या केवळ 10 टक्के लोकसंख्येचे नियंत्रण आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ते बिहारच्या कुटुम्बा येथे प्रचारसभेत बोलत होते. राहुल यांच्या या विधानावर भाजपाने तीव्र प्रतिक्रिया देत, ते “भारतीय सेन्य विरोधी” असल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी म्हणाले, “देशातील 90 टक्के जनता दलित, महादलित, मागास, अतिमागास आणि अल्पसंख्याक समाजातील आहे. पण 500 मोठ्या कंपन्या निवडा, तुम्हाला त्या कंपन्यांत या घटकांतील प्रतिनिधी सापडणार नाही. तेथे सर्व मोठ्या पदांवर, नोकऱ्यांवर आणि अगदी सैन्यातही त्याच 10 टक्के लोकसंख्या असलेल्या लोकांचे वर्चस्व आहे. आपल्याला उर्वरित 90 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व कुटेही आढळणार नाही.

मुख्यमंत्री नीतीश कुमारांवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले, “बिहारमधील लोक आज देशभरात मजुरी करत आहेत. इमारती, रस्ते, कारखाने तेच बांधतात. नीतीश कुमारांनी बिहारमधून रोजगारच संपवला आहे. मोदी-शहा रिमोटने नीतीश कुमारांचा ‘चॅनल’ बदलतात.”

राहुल गांधींच्या या विधानानंतर, भाजपाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी 'एक्स'वरून पलटवार केला आहे. त्यांनी लिहिले, “राहुल गांधी आता आपल्या सशस्त्र दलांनाही जातीच्या आधारे विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय भूदल, नौदल आणि हवाईदल, धर्म, जात, पंथ अथवा वर्गावर नव्हे, तर राष्ट्रप्रथम या तत्वावर उभी आहे. राहुल गांधी  आपल्या शूर सैन्याचा द्वेश करतात. ते भारतीय सेन्य विरोधी आहेत."

दरम्यान, राहुल गांधी यांनी आरोप केला की, “भाजपाने नीतीश कुमार यांना कॅप्चर केले आहे आणि आता बिहारमध्ये नीतीश सरकार बनणार नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi's Army Control Statement Sparks Controversy Before Bihar Elections

Web Summary : Rahul Gandhi's claim that 10% control Indian Army ignited controversy in Bihar. BJP criticized his statement as divisive and anti-army. Gandhi also attacked Nitish Kumar, alleging BJP controls him and Bihar lacks jobs.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५