शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Bihar Election 2020: बिहारमध्ये भाजपाचा शंखनाद; नड्डा म्हणाले, मोदी-नीतीश यांनी राजकारणाची संस्कृती बदलली 

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 11, 2020 18:03 IST

नड्डा म्हणाले, शेतकरी कायदा आणून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची मुक्ती केली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या कष्टाचा हिशेब घेण्यासाठी जागो-जागी भटकावे लागणार नाही. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही हल्ला चढवला. 70 वर्षांत त्यांनी (काँग्रेस) केवळ जातीच्या आधारावरच राजकारण केले, असेही नड्डा म्हणाले. (BJP, jp nadda)

ठळक मुद्देनीतीश कुमारांनी बिहारचे चित्र बदलले - जे. पी. नड्डामोदीनी राजकारणाची संस्कृती बदलली - जे. पी. नड्डानीतीश यांच्या हाती बिहारच्या नेतृत्वाची धुरा देणे आवश्यक - जे. पी. नड्डा

पाटणा - भाजपाने रविवारी बिहार विधानसभा निवडणुकीचा शंखनाद केला. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी आज मोक्ष नगरी गया येथील गांधी मैदानातू व्हर्चुअलसोबतच (Virtual) अॅक्चुअल रॅलीलाही संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रशंसा करत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

नड्डा म्हणाले, शेतकरी कायदा आणून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची मुक्ती केली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या कष्टाचा हिशेब घेण्यासाठी जागो-जागी भटकावे लागणार नाही. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही हल्ला चढवला. 70 वर्षांत त्यांनी (काँग्रेस) केवळ जातीच्या आधारावरच राजकारण केले, असेही नड्डा म्हणाले. 

नीतीश कुमारांनी बिहारचे चित्र बदलले - नड्डा म्हणाले, एनडीए सरकारने शिक्षणासाठी अत्यंत उत्तम प्रकारे काम केले आहे. बिहारमध्ये एनडीए काळात 14 वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली गेली आहेत. आम्ही पाच वर्ष विद्यार्थ्यांसाठी वेगळे बजेट तयार केले. बिहारच्या विकासासाठी भाजपा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. तसेच नितिश कुमारांनी बिहारचे चित्र पालटले आहे. बिहारने अनेक आयएएस आणि आयपीएस दिले आहेत. तसेच विरोधकांवर निशाणा साधताना ते म्हणाले, की निवडणुका या विकासासाठीच होत असतात. 

मोदीनी राजकारणाची संस्कृती बदलली - नड्डा म्हणाले, नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारांनी भारत आणि बिहारच्या राजकारणाची संस्कृती बदलली. काँग्रेस पक्ष जाती-धर्माच्या नावावर व्होट बँकेचे राजकारण करत होता. मात्र, मोदींनी देशातील राजकारणाची संस्कृती बदलली. तसेच एनडीएने बिहारसाठी अनेक विकासाच्या योजना सुरू केल्या.

नीतीश यांच्या हाती बिहारच्या नेतृत्वाची धुरा देणे आवश्यक -भाजपा अध्यक्ष म्हणाले, देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या हातात सुरक्षित आहे. मात्र, बिहारचे नेतृत्व नीतीश यांच्या हातात सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे बिहारमध्ये एनडीएचे सरकार आणण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रितपणे काम करावे लागणार आहे. 

पूर्वीच्या बिहारमध्ये आणि आजच्या बिहारमध्ये मोठा फरक आहे. एनडीएच्या काळात बिहारमध्ये अनेक कामे झाली आहेत, होत आहेत. ही कामे अशीच सुरू ठेवण्यची जबाबदारी आपली आहे. यावेळी नड्डा यांनी एनडीएच्या काळात झालेल्या अनेक कामांची आठवणही जनतेला करून दिली.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी