शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Election 2020: बिहारमध्ये भाजपाचा शंखनाद; नड्डा म्हणाले, मोदी-नीतीश यांनी राजकारणाची संस्कृती बदलली 

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 11, 2020 18:03 IST

नड्डा म्हणाले, शेतकरी कायदा आणून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची मुक्ती केली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या कष्टाचा हिशेब घेण्यासाठी जागो-जागी भटकावे लागणार नाही. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही हल्ला चढवला. 70 वर्षांत त्यांनी (काँग्रेस) केवळ जातीच्या आधारावरच राजकारण केले, असेही नड्डा म्हणाले. (BJP, jp nadda)

ठळक मुद्देनीतीश कुमारांनी बिहारचे चित्र बदलले - जे. पी. नड्डामोदीनी राजकारणाची संस्कृती बदलली - जे. पी. नड्डानीतीश यांच्या हाती बिहारच्या नेतृत्वाची धुरा देणे आवश्यक - जे. पी. नड्डा

पाटणा - भाजपाने रविवारी बिहार विधानसभा निवडणुकीचा शंखनाद केला. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी आज मोक्ष नगरी गया येथील गांधी मैदानातू व्हर्चुअलसोबतच (Virtual) अॅक्चुअल रॅलीलाही संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रशंसा करत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

नड्डा म्हणाले, शेतकरी कायदा आणून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची मुक्ती केली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या कष्टाचा हिशेब घेण्यासाठी जागो-जागी भटकावे लागणार नाही. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही हल्ला चढवला. 70 वर्षांत त्यांनी (काँग्रेस) केवळ जातीच्या आधारावरच राजकारण केले, असेही नड्डा म्हणाले. 

नीतीश कुमारांनी बिहारचे चित्र बदलले - नड्डा म्हणाले, एनडीए सरकारने शिक्षणासाठी अत्यंत उत्तम प्रकारे काम केले आहे. बिहारमध्ये एनडीए काळात 14 वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली गेली आहेत. आम्ही पाच वर्ष विद्यार्थ्यांसाठी वेगळे बजेट तयार केले. बिहारच्या विकासासाठी भाजपा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. तसेच नितिश कुमारांनी बिहारचे चित्र पालटले आहे. बिहारने अनेक आयएएस आणि आयपीएस दिले आहेत. तसेच विरोधकांवर निशाणा साधताना ते म्हणाले, की निवडणुका या विकासासाठीच होत असतात. 

मोदीनी राजकारणाची संस्कृती बदलली - नड्डा म्हणाले, नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारांनी भारत आणि बिहारच्या राजकारणाची संस्कृती बदलली. काँग्रेस पक्ष जाती-धर्माच्या नावावर व्होट बँकेचे राजकारण करत होता. मात्र, मोदींनी देशातील राजकारणाची संस्कृती बदलली. तसेच एनडीएने बिहारसाठी अनेक विकासाच्या योजना सुरू केल्या.

नीतीश यांच्या हाती बिहारच्या नेतृत्वाची धुरा देणे आवश्यक -भाजपा अध्यक्ष म्हणाले, देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या हातात सुरक्षित आहे. मात्र, बिहारचे नेतृत्व नीतीश यांच्या हातात सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे बिहारमध्ये एनडीएचे सरकार आणण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रितपणे काम करावे लागणार आहे. 

पूर्वीच्या बिहारमध्ये आणि आजच्या बिहारमध्ये मोठा फरक आहे. एनडीएच्या काळात बिहारमध्ये अनेक कामे झाली आहेत, होत आहेत. ही कामे अशीच सुरू ठेवण्यची जबाबदारी आपली आहे. यावेळी नड्डा यांनी एनडीएच्या काळात झालेल्या अनेक कामांची आठवणही जनतेला करून दिली.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी