शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

Bihar Election 2020: बिहारमध्ये भाजपाचा शंखनाद; नड्डा म्हणाले, मोदी-नीतीश यांनी राजकारणाची संस्कृती बदलली 

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 11, 2020 18:03 IST

नड्डा म्हणाले, शेतकरी कायदा आणून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची मुक्ती केली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या कष्टाचा हिशेब घेण्यासाठी जागो-जागी भटकावे लागणार नाही. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही हल्ला चढवला. 70 वर्षांत त्यांनी (काँग्रेस) केवळ जातीच्या आधारावरच राजकारण केले, असेही नड्डा म्हणाले. (BJP, jp nadda)

ठळक मुद्देनीतीश कुमारांनी बिहारचे चित्र बदलले - जे. पी. नड्डामोदीनी राजकारणाची संस्कृती बदलली - जे. पी. नड्डानीतीश यांच्या हाती बिहारच्या नेतृत्वाची धुरा देणे आवश्यक - जे. पी. नड्डा

पाटणा - भाजपाने रविवारी बिहार विधानसभा निवडणुकीचा शंखनाद केला. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी आज मोक्ष नगरी गया येथील गांधी मैदानातू व्हर्चुअलसोबतच (Virtual) अॅक्चुअल रॅलीलाही संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रशंसा करत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

नड्डा म्हणाले, शेतकरी कायदा आणून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची मुक्ती केली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या कष्टाचा हिशेब घेण्यासाठी जागो-जागी भटकावे लागणार नाही. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही हल्ला चढवला. 70 वर्षांत त्यांनी (काँग्रेस) केवळ जातीच्या आधारावरच राजकारण केले, असेही नड्डा म्हणाले. 

नीतीश कुमारांनी बिहारचे चित्र बदलले - नड्डा म्हणाले, एनडीए सरकारने शिक्षणासाठी अत्यंत उत्तम प्रकारे काम केले आहे. बिहारमध्ये एनडीए काळात 14 वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली गेली आहेत. आम्ही पाच वर्ष विद्यार्थ्यांसाठी वेगळे बजेट तयार केले. बिहारच्या विकासासाठी भाजपा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. तसेच नितिश कुमारांनी बिहारचे चित्र पालटले आहे. बिहारने अनेक आयएएस आणि आयपीएस दिले आहेत. तसेच विरोधकांवर निशाणा साधताना ते म्हणाले, की निवडणुका या विकासासाठीच होत असतात. 

मोदीनी राजकारणाची संस्कृती बदलली - नड्डा म्हणाले, नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारांनी भारत आणि बिहारच्या राजकारणाची संस्कृती बदलली. काँग्रेस पक्ष जाती-धर्माच्या नावावर व्होट बँकेचे राजकारण करत होता. मात्र, मोदींनी देशातील राजकारणाची संस्कृती बदलली. तसेच एनडीएने बिहारसाठी अनेक विकासाच्या योजना सुरू केल्या.

नीतीश यांच्या हाती बिहारच्या नेतृत्वाची धुरा देणे आवश्यक -भाजपा अध्यक्ष म्हणाले, देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या हातात सुरक्षित आहे. मात्र, बिहारचे नेतृत्व नीतीश यांच्या हातात सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे बिहारमध्ये एनडीएचे सरकार आणण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रितपणे काम करावे लागणार आहे. 

पूर्वीच्या बिहारमध्ये आणि आजच्या बिहारमध्ये मोठा फरक आहे. एनडीएच्या काळात बिहारमध्ये अनेक कामे झाली आहेत, होत आहेत. ही कामे अशीच सुरू ठेवण्यची जबाबदारी आपली आहे. यावेळी नड्डा यांनी एनडीएच्या काळात झालेल्या अनेक कामांची आठवणही जनतेला करून दिली.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी