शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

शिक्षणाचा खेळखंडोबा! एकाच खोलीत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 14:21 IST

प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग एकाच खोलीत सुरू आहेत. हिंदी आणि उर्दू भाषेचे वर्ग एकाच खोलीत घेतले जातात.

नवी दिल्ली - बिहारमध्येशिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मुलांना चांगल्या मूलभूत सुविधांसह चांगलं शिक्षण देणं आणि त्यांना चांगलं भविष्य घडवण्यास मदत करणं, हा त्याचा उद्देश आहे. असं असतानाही बिहारमधील कटिहार जिल्ह्यातून प्राथमिक शिक्षणाचं असं चित्र समोर आलं आहे, जे पाहून तिथल्या शिक्षण व्यवस्थेच्या बिकट अवस्थेचा अंदाज बांधता येईल. जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग एकाच खोलीत सुरू आहेत. हिंदी आणि उर्दू भाषेचे वर्ग एकाच खोलीत घेतले जातात. हिंदी आणि उर्दू शिक्षक एकाचवेळी एकाच ब्लॅकबोर्डवर विद्यार्थ्यांना दोन्ही भाषा शिकवतात. एका बाजूला हिंदी भाषिक आणि दुसऱ्या बाजूला उर्दू भाषिक विद्यार्थांना शिकवलं जातं.

बिहारमध्ये शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आणि मुलांचं भविष्य सुधारण्यासाठी सुविधांचा विस्तार करण्याचे दावे दररोज केले जात आहेत, मात्र कटिहारमधून असं चित्र समोर आलं आहे, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. जिल्ह्यातील मनिहारी ब्लॉकमध्ये असलेल्या उर्दू प्राथमिक शाळेच्या एकाच खोलीत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग चालवले जातात. आणखी आश्चर्याची बाब म्हणजे एकाच ब्लॅकबोर्डवर दोन शिक्षक एकाच वेळी उर्दू आणि हिंदी भाषा शिकवतात.

मनिहारी ब्लॉकमधील उर्दू प्राथमिक शाळा 2017 मध्ये विश्वनाथ चौधरी आदर्श माध्यमिक विद्यालय आझमपूर गोला येथे हलविण्यात आली. तेव्हापासून वर्गाची ही समस्या कायम आहे. आझमपूर गोला येथील विश्वनाथ चौधरी आदर्श माध्यमिक शाळेच्या शिक्षिका नीलम कुमारी सांगतात की त्यांच्याकडे आधीच खोल्यांची कमतरता होती. प्रशासकीय आदेशानंतर इयत्ता 1 ते 5 वी साठी एकच खोली दिली जाऊ शकते. तेव्हापासून आजपर्यंत इयत्ता पाचवीपर्यंतचे वर्ग एकाच खोलीत सुरू आहेत.

एकाच खोलीत आणि एकाच ब्लॅकबोर्डवर हिंदी आणि उर्दू एकत्र शिकवण्याच्या सक्तीबाबत उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मणिहारी प्रफुल्लित मिंज सांगतात की, शाळेत तीन शिक्षक आहेत. परंतु खोली आणि ब्लॅकबोर्ड नसल्यामुळे असं करावं लागत आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी कामेश्वर प्रसाद गुप्ता सांगतात की, त्यांना आता या विषयाची माहिती मिळाली आहे. मनिहारी गटशिक्षणाधिकार्‍यांशी बोलणं झालं असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असं सांगितलं गेलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Educationशिक्षणBiharबिहार