शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

शिक्षणाचा खेळखंडोबा! एकाच खोलीत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग; विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 14:21 IST

प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग एकाच खोलीत सुरू आहेत. हिंदी आणि उर्दू भाषेचे वर्ग एकाच खोलीत घेतले जातात.

नवी दिल्ली - बिहारमध्येशिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मुलांना चांगल्या मूलभूत सुविधांसह चांगलं शिक्षण देणं आणि त्यांना चांगलं भविष्य घडवण्यास मदत करणं, हा त्याचा उद्देश आहे. असं असतानाही बिहारमधील कटिहार जिल्ह्यातून प्राथमिक शिक्षणाचं असं चित्र समोर आलं आहे, जे पाहून तिथल्या शिक्षण व्यवस्थेच्या बिकट अवस्थेचा अंदाज बांधता येईल. जिल्ह्यातील प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग एकाच खोलीत सुरू आहेत. हिंदी आणि उर्दू भाषेचे वर्ग एकाच खोलीत घेतले जातात. हिंदी आणि उर्दू शिक्षक एकाचवेळी एकाच ब्लॅकबोर्डवर विद्यार्थ्यांना दोन्ही भाषा शिकवतात. एका बाजूला हिंदी भाषिक आणि दुसऱ्या बाजूला उर्दू भाषिक विद्यार्थांना शिकवलं जातं.

बिहारमध्ये शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी आणि मुलांचं भविष्य सुधारण्यासाठी सुविधांचा विस्तार करण्याचे दावे दररोज केले जात आहेत, मात्र कटिहारमधून असं चित्र समोर आलं आहे, जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. जिल्ह्यातील मनिहारी ब्लॉकमध्ये असलेल्या उर्दू प्राथमिक शाळेच्या एकाच खोलीत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग चालवले जातात. आणखी आश्चर्याची बाब म्हणजे एकाच ब्लॅकबोर्डवर दोन शिक्षक एकाच वेळी उर्दू आणि हिंदी भाषा शिकवतात.

मनिहारी ब्लॉकमधील उर्दू प्राथमिक शाळा 2017 मध्ये विश्वनाथ चौधरी आदर्श माध्यमिक विद्यालय आझमपूर गोला येथे हलविण्यात आली. तेव्हापासून वर्गाची ही समस्या कायम आहे. आझमपूर गोला येथील विश्वनाथ चौधरी आदर्श माध्यमिक शाळेच्या शिक्षिका नीलम कुमारी सांगतात की त्यांच्याकडे आधीच खोल्यांची कमतरता होती. प्रशासकीय आदेशानंतर इयत्ता 1 ते 5 वी साठी एकच खोली दिली जाऊ शकते. तेव्हापासून आजपर्यंत इयत्ता पाचवीपर्यंतचे वर्ग एकाच खोलीत सुरू आहेत.

एकाच खोलीत आणि एकाच ब्लॅकबोर्डवर हिंदी आणि उर्दू एकत्र शिकवण्याच्या सक्तीबाबत उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मणिहारी प्रफुल्लित मिंज सांगतात की, शाळेत तीन शिक्षक आहेत. परंतु खोली आणि ब्लॅकबोर्ड नसल्यामुळे असं करावं लागत आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी कामेश्वर प्रसाद गुप्ता सांगतात की, त्यांना आता या विषयाची माहिती मिळाली आहे. मनिहारी गटशिक्षणाधिकार्‍यांशी बोलणं झालं असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल, असं सांगितलं गेलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Educationशिक्षणBiharबिहार