शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'भाजपला भारताला नथुराम गोडसेचा देशा बनवायचाय; उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 09:58 IST

'भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून भारताला नथुराम गोडसेचे राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे', अशी घणाघाती टीका बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रकाश यांनी केली.

'भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून भारताला नथुराम गोडसेचे राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे', अशी घणाघाती टीका बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रकाश यांनी केली. बीबीसी कार्यालयातील आयकर सर्वेक्षणावर बोलताना त्यांनी ही टीका केली. असी छापे टाकून केंद्र सरकारला संदेश द्यायचा आहे की जो कोणी सरकारविरोधात बोलेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा आरोपही तेजस्वी यादव यांनी केला.

'बीबीसीचे काय झाले ते तुम्हा सर्वांना माहित आहे. गुजरातमध्ये काय झाले हे सर्वांना माहीत आहे. त्यांना महात्मा गांधींचा देश नथुराम गोडसेच्या देशात बदलायचा आहे. ते हिंदु राष्ट्राबद्दल बोलतात पण आपली विविधता हेच आपले सौंदर्य आहे, असंही तेजस्वी यादव म्हणाले. 

अबब...स्कूटीच्या व्हीआयपी क्रमांकासाठी तब्बल १.१२ कोटी, जाणून घ्या नंबर

याअगोदर जेडीयू नेते सुनील सिंह यांनीही भाजपवर टीका केली. ही कारवाई सूडाच्या राजकारणाचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले होते. 'बीबीसीवर आयटीच्या छाप्यावरून दिसून येते की केंद्र सरकार राजकीय सूडबुद्धीसाठी आयकर, सीबीआय आणि ईडी सारख्या केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत आहे, 'बीबीसी ही एक प्रेस आहे आणि प्रेस हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. ही कारवाई लोकशाहीवर हल्ला असून केंद्र सरकार त्याला जबाबदार आहे, असा आरोपही सुनील सिंग यांनी केला. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही भाजपवर टीकास्त्र सोडले. 'देशात प्रत्येक धर्म आणि पंथाचे लोक राहतात. कोणाला भारताला 'हिंदू राष्ट्र' बनवायचे असेल, तर त्याला देश नष्ट करायचा आहे. भारतात हे शक्य आहे का?, असंही ते म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी