शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार?; एनडीएत सामील होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 07:02 IST

बिहार विधानसभा निवडणुकांत एनडीएने १२५, तर महाआघाडीने ११० जागा जिंकल्या आहेत. 

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये काठावरचे बहुमत मिळालेल्या एनडीएने आणखी आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बिहार काँग्रेसमध्ये फूट पडून त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांपैकी काही जण एनडीएत सामील होतील, अशी जोरदार चर्चा आहे. या निवडणुकांत महाआघाडीमध्ये काँग्रेसने सर्वात खराब कामगिरी केली आहे. त्यामुळे महाआघाडी सत्ता मिळविण्यापासून वंचित राहिली. काँग्रेसचे १९ आमदार निवडून आले असून त्यांनी एनडीएमध्ये सामील व्हावे, असे आवाहन हिंदुस्थान अवाम मोर्चाचे नेते जितनराम मांझी यांनी केले आहे. त्यानंतरच बिहार काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याच्या चर्चेला वेग आला. 

बिहार विधानसभा निवडणुकांत एनडीएने १२५, तर महाआघाडीने ११० जागा जिंकल्या आहेत.  काँग्रेसमध्ये फूट पडल्यास बिहारमधील राजकारणाला २०१७ सालाप्रमाणे वेगळे वळण लागेल. त्यावर्षी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महाआघाडीची साथ सोडून एनडीएमध्ये प्रवेश केला.  त्यावेळी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी यांच्यासह काही नेते नितीशकुमारांच्या जनता दल (यु) मध्ये सामील झाले होते. (वृत्तसंस्था) 

घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता 

गेल्या काही वर्षांत गोवा, गुजरात, मध्यप्रदेशातील काही काँग्रेस आमदार भाजपमध्ये गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बिहारमध्येही याच घटनेची पुनरावृत्ती होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसे होईल यासाठी भाजप वाट पाहत आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेस