शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

बिहार काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार?; एनडीएत सामील होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2020 07:02 IST

बिहार विधानसभा निवडणुकांत एनडीएने १२५, तर महाआघाडीने ११० जागा जिंकल्या आहेत. 

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये काठावरचे बहुमत मिळालेल्या एनडीएने आणखी आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. बिहार काँग्रेसमध्ये फूट पडून त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांपैकी काही जण एनडीएत सामील होतील, अशी जोरदार चर्चा आहे. या निवडणुकांत महाआघाडीमध्ये काँग्रेसने सर्वात खराब कामगिरी केली आहे. त्यामुळे महाआघाडी सत्ता मिळविण्यापासून वंचित राहिली. काँग्रेसचे १९ आमदार निवडून आले असून त्यांनी एनडीएमध्ये सामील व्हावे, असे आवाहन हिंदुस्थान अवाम मोर्चाचे नेते जितनराम मांझी यांनी केले आहे. त्यानंतरच बिहार काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याच्या चर्चेला वेग आला. 

बिहार विधानसभा निवडणुकांत एनडीएने १२५, तर महाआघाडीने ११० जागा जिंकल्या आहेत.  काँग्रेसमध्ये फूट पडल्यास बिहारमधील राजकारणाला २०१७ सालाप्रमाणे वेगळे वळण लागेल. त्यावर्षी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महाआघाडीची साथ सोडून एनडीएमध्ये प्रवेश केला.  त्यावेळी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी यांच्यासह काही नेते नितीशकुमारांच्या जनता दल (यु) मध्ये सामील झाले होते. (वृत्तसंस्था) 

घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता 

गेल्या काही वर्षांत गोवा, गुजरात, मध्यप्रदेशातील काही काँग्रेस आमदार भाजपमध्ये गेल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बिहारमध्येही याच घटनेची पुनरावृत्ती होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसे होईल यासाठी भाजप वाट पाहत आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेस